भारतीय संघ विश्वचषक 2023 स्पर्धेत रविवारी (5 नोव्हेंबर) आपला आठवा सामना खेळला. या सामन्यात भारतापुढे दक्षिण आफ्रिका संघाचे आव्हान होते. ईडन गार्डन्स येथे झालेल्या या सामन्यात भारतीय संघाने विराट कोहलीच्या शतकाच्या जोरावर 327 धावा उभारल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ भारतीय गोलंदाजां पुढे ढेपाळला. भारतीय गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला केवळ 83 धावांवर सर्वबाद करत 243 धावांनी मोठा विजय मिळवला. भारतीय संघाचा हा स्पर्धेतील सलग आठवा विजय ठरला. या विजयानंतर बोलताना भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने मोठे विधान केले.
सामन्यानंतर बोलताना रोहित शर्मा म्हणाला,
“मागील तीन सामन्यात आम्ही परिस्थितीचा योग्य अंदाज घेतला आहे. इंग्लंडविरुद्ध आमच्यावर दबाव होता तर श्रीलंकेविरुद्ध देखील पहिल्या षटकात बळी गेलेला. त्यानंतर कोणीतरी जबाबदारी घेत धावा उभारल्या आणि त्यानंतर वेगवान गोलंदाजांनी सामना नावे करून दिला. आजही आम्हाला विराट सारखा कोणीतरी डाव उभारून देणारा हवा होता. तसेच श्रेयस यांनी देखील उत्कृष्ट खेळ दाखवला.”
तो पुढे रवींद्र जडेजाचे कौतुक करताना म्हणाला,
“जडेजा मागील अनेक वर्षांपासून सातत्याने तीनही प्रकारचे क्रिकेट खेळतोय. त्याचा अनुभव मोठा आहे आणि तो तसेच प्रदर्शन करतो. शमी आणि कुलदीप उत्कृष्ट कामगिरी करतायेत. सर्वजण जबाबदारी ओळखून खेळतायेत. आता पुढे दोन मोठे सामने येत आहेत आणि आम्ही कोणताही बदल करू इच्छित नाही.”
भारतीय संघ आता आपला अखेरचा साखळी सामना नेदरलँड्स विरुद्ध खेळेल. त्यानंतर भारतीय संघ उपांत्य फेरीत उतरेल.
(Rohit Sharma Speaks After Best South Africa In ODI World Cup)
हेही वाचा-
अवघ्या आठ डावांमध्ये विराटची मोठी मजल, फक्त सचिन आणि रोहितला जवलेली कामगिरी दाखवली करून
तो आला आणि विक्रम मोडून गेला! श्रेयसने 77 धावांची खेळी करताच सचिनचा ‘तो’ Record उद्ध्वस्त