शारजाह| आयपीएलमध्ये शनिवारी (17 ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने चेन्नई सुपर किंग्सचा 5 गडी राखून पराभव केला. दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. धवनने 58 चेंडूत 101 धावांची नाबाद खेळी केली. शिखरचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलेच शतक होते. शतक ठोकून त्याने नकोसा विक्रम नोंदवला आहे.
धवनने त्याच्या 167 व्या डावात आयपीएलमध्ये पहिले शतक झळकावले. त्यामुळे तो आयपीएलमध्ये पहिले शतक ठोकण्यास सर्वाधिक डाव खेळणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहलीच्या नावावर हा अनोखा विक्रम होता. कोहलीने त्याच्या 120 व्या डावात शतक झळकावले होते. अंबाती रायुडूने 119 आणि सुरेश रैनाने 88 व्या डावात पहिले शतक ठोकले होते.
याशिवाय आयपीएलमध्ये शिखरच्या नावावर 39 अर्धशतके आहेत आणि आयपीएलमध्ये सर्वाधिक अर्धशतके करण्यात तो सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरनंतर दुसर्या क्रमांकावर आहे.
शनिवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार एमएस धोनीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. चेन्नईने 20 षटकात 4 गडी गमावून 179 धावा केल्या. सलामीवीर फाफ डु प्लेसिसने 58 आणि अनुभवी फलंदाज अंबाती रायुडूने 45 धावा केल्या. दिल्लीसाठी ही आव्हानात्मक धावसंख्या असली तरी धवनने आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उठविला आणि शेवटपर्यंत तो खेळपट्टीवर टिकून राहिला. तसेच कर्णधार श्रेयस अय्यर (23 चेंडूत 23) आणि अष्टपैलू मार्कस स्टॉयनिस (14 चेंडूत 24) यांनी त्याला उत्तम साथ दिली.
डावाच्या शेवटी अष्टपैलू अक्षर पटेलने केवळ 5 चेंडूत तीन षटकारांच्या मदतीने 21 धावा करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
…म्हणून ब्राव्होऐवजी जडेजाने केली शेवटच्या षटकात गोलंदाजी, धोनीने सांगितले कारण
सुपरमॅनने करून दाखवलं! राजस्थानच्या हातून विजय खेचून आणणाऱ्या डिविलिअर्सचे ट्विटरवर जोरदार कौतुक
“धवनच्या विकेटसाठी चेन्नईचे हवन”, दिल्लीविरुद्धच्या खराब कामगिरीमुळे ट्विटरवर उडतेय खिल्ली
ट्रेंडिंग लेख –
आयपीएल २०२०: असे ३ खेळाडू, ज्यांनी एक खेळी संघासाठी नाही तर स्वतःसाठी खेळली
-यंदा दिल्ली कॅपिटल्स का करत आहे जबरदस्त कामगिरी? जाणून घ्या यशाची ३ कारणे