भारत विरूद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) संघात उद्या (23 फेब्रुवारी) रोजी आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीतील (ICC Champions Trophy 2025) पाचवा सामना खेळला जाणार आहे. दरम्यान दोन्ही संघ दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमर आमने-सामने असतील. तत्पूर्वी या मैदानावरील खेळपट्टी कशी असेल? गोलंदाजांना मदत करेल की फलंदाजांना? याबद्दल भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिलने (Shubman Gill) वक्तव्य केले आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत गिल म्हणाला की, “भारत-पाकिस्तान सामन्याबद्दल कमी-अधिक प्रचार आहे की नाही हे मी सांगू शकत नाही. भारत-पाकिस्तान क्रिकेटचा इतिहास खूप जुना आहे. हा एक रोमांचक सामना आहे, पण त्यामुळे आमच्यासाठी काहीही बदल होत नाही. हा एक महत्त्वाचा सामना आहे पण सर्वात महत्त्वाचा सामना अंतिम सामना असेल.”
युएईमध्ये झालेल्या टी20 विश्वचषकात ड्यूने महत्त्वाची भूमिका बजावली होती आणि वनडे स्वरूपात ते आणखी महत्त्वाचे असेल. तो असेही म्हणाला की येथे दव नसल्याने दुधाळ प्रकाशात फलंदाजी करणे कठीण होईल.
गिल म्हणाला की, “गेल्या सामन्यात इथे दव पडला नव्हता. अशा परिस्थितीत, फ्लडलाइट्समध्ये फलंदाजी करणे आणि स्ट्राइक रोटेट करणे सोपे नाही. मधल्या षटकांमध्ये चांगली फलंदाजी करणारा संघ जिंकण्याची शक्यता जास्त असते. दव नसल्याने टाॅसचा फारसा फरक पडणार नाही. नंतर फलंदाजी करणाऱ्या संघावर दबाव असेल. आम्ही आक्रमक आणि सकारात्मक क्रिकेट खेळू पण ते खेळपट्टीवरही अवलंबून असेल. या विकेटवर 300 किंवा 280 धावा करणे चांगले ठरेल.”
पहिल्या सामन्यात भारताने बांगलादेशला हरवले होते पण पाकिस्तानला न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला आणि आता त्यांना भारताविरूद्धचा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागेल.
पुढे बोलताना गिल म्हणाला, “रोहित भाई हवेत जास्त फटके मारतो आणि षटकार मारण्याचा प्रयत्न करतो. मी जमिनीवरील शाॅट्स शोधतो. यामुळे आमची जोडी यशस्वी होते कारण आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे शॉट्स खेळतो.”
महत्त्वाच्या बातम्या-
“स्वार्थ सोड बाबर!” – भारताशी लढतीच्या आधी माजी खेळाडूंची तुफान टीका
2 मोठे बदल करून मैदानात उतरू शकतो भारतीय संघ, भारत-पाक सामन्यापूर्वी संघ घेऊ शकतो मोठे निर्णय
IND vs PAK: “मला वाटतं की पाकिस्तान जिंकावा” माजी भारतीय क्रिकेटपटूच्या वक्तव्यानं उडाली खळबळ!