जरी टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्याने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात मोठी खेळी केली नसली तरीही त्याने 9 धावांच्या खेळीत एक मोठा टप्पा गाठला. आतापर्यंत इतर कोणत्याही भारतीयाला हे करता आलेले नाही. भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी20 मालिकेतील पहिला सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला, ज्यामध्ये यशस्वी जयस्वाल (40), शुभमन गिल (34), सूर्यकुमार यादव (58) आणि रिषभ पंत (49) यांच्या दमदार फलंदाजीच्या जोरावर भारताने निर्धारित 20 षटकांत 213 धावांची मोठी धावसंख्या उभारली.
वास्तविक, हार्दिक पांड्या आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1500 धावा आणि 50 विकेट्स पूर्ण करणारा पहिला भारतीय क्रिकेटर बनला आहे. या सामन्यापूर्वी हार्दिकच्या नावावर टी20 इंटरनॅशनलमध्ये 1492 धावा होत्या. या सामन्यात 9 धावा करत त्याने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 1500 धावांचा आकडा गाठला. अशी कामगिरी करणारा तो 8वा भारतीय ठरला. हार्दिकच्या आधी रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, शिखर धवन, एमएस धोनी आणि सुरेश रैना यांनी ही कामगिरी केली आहे. विकेट्सबद्दल बोलायचे झाले तर हार्दिकच्या नावावर या फॉरमॅटमध्ये 84 विकेट्स आहेत.
हार्दिक पांड्या टी20 करिअरबाबत बोलायचे झाल्यास त्याने आतापर्यंत 101 सामने खेळला आहे. ज्यामध्ये 140 च्या स्ट्राइक रेटने 1501 धावा केल्या आहेत. या दरम्यान हार्दिकच्या बॅटमधून 4 अर्धशतके पहायला मिळाले आहेत. या फाॅरमॅटमध्ये त्याची 71 सर्वोच धावसंख्या आहे. तर गोलंदाजी करताना हार्दिकने 84 विकेट्स मिळवल्या आहेत.
सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास टीम इंडियाने 43 धावांनी श्रीलंकेवर दमदार विजय मिळवला. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने 213 धावांचे मजबूत लक्ष्य लंकेसमोर ठेवले. धावांचा पाठलाग करताना यजमन संघाची सुरुवात दमदार झाली. संघाने 14 षटकात एक विकेट गमावून 140 धावा केल्या होत्या. मात्र आखेरच्या षटकांत श्रीलंका संघ टीम इंडियाच्या गोलंदाजी समोर डगमगला. संघ 170 धावांत तंबूत परतला. गोलंदाजी करताना भारताकडून रियान परागने शानदार कामगिरी केली. त्याने 1.2 षटके टाकले. ज्यामध्ये 5 धावा देत 3 विकेट मिळवल्या. तर कर्णधार सूर्यकुमार यादवच्या तुफानी अर्धशतकी खेळीमुळे त्याला सामनवीर पुरस्कार मिळाले.
हेही वाचा-
पॅरिस ऑलिम्पिक : हाॅकीमध्येही भारताची शानदार कामगिरी, न्यूझीलंडचा 3-2 ने पराभव
IND vs SL पहिला सामना जिंकून भारताची विजयी सलामी, सूर्यकुमारचं झंझावाती अर्धशतक
पॅरिस ऑलिम्पिक : चिराग-सात्विकनं पहिल्याच सामन्यात मिळवला शानदार विजय