आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात संयुक्त अरब अमिराती (युएई) व ओमान येथे होणाऱ्या टी२० विश्वचषकासाठी भारतीय संघ घोषित करण्यात आला आहे. निवडसमितीने काही आश्चर्यकारक निर्णय घेत अपेक्षित नसलेल्या अनेक अनुभवी खेळाडूंना संघात स्थान दिले. जवळपास मागील चार वर्षापासून भारताच्या मर्यादित षटकांच्या संघाचा भाग नसलेल्या अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन यालादेखील या विश्वचषकासाठी पाचारण करण्यात आले. मात्र, या निर्णयावर भारताच्या दिग्गज क्रिकेटपटूने टिप्पणी केली आहे.
aनपेक्षीतपणे मिळाली संधी
कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा सर्वोत्तम फिरकीपटू असलेल्या रविचंद्रन आश्विनने आपला अखेरचा टी२० सामना ९ जुलै २०१७ रोजी वेस्ट इंडिजविरुद्ध खेळला होता. त्यानंतर त्याला अचानकपणे या विश्वचषकासाठी संघात संधी देण्यात आली. भारताचा प्रमुख फिरकी अष्टपैलू वॉशिंग्टन सुंदर दुखापतग्रस्त असल्याने एक ऑफस्पिनर म्हणून अश्विनची निवड झाल्याचे सांगण्यात येत आहे. अश्विनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा दांडगा अनुभव असल्याने तसेच युएईतील मैदाने फिरकीला पोषक असल्याने अश्विन या स्पर्धेत चांगली कामगिरी करू शकतो.
सांत्वना देण्यासाठी अश्विनची निवड
रविचंद्रन आश्विनची टी२० विश्वचषकासाठी निवड झाल्यानंतर भारताचे माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी महत्त्वपूर्ण टिपणी केली आहे. गावसकर म्हणाले,
“अश्विनचे पुनरागमन ही चांगली गोष्ट आहे. मात्र, त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार का? हे पाहण्यासारखे असेल. तो इंग्लंडमधील संघाचाही भाग होता पण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही. इंग्लंड दौऱ्यातील निराशा दूर करण्यासाठी व त्याचे सांत्वन करण्यासाठी बहुधा त्याची विश्वचषकाच्या संघात निवड केली असेल.”
गोलंदाजांच्या जागतिक कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या अश्विनला इंग्लंडविरुद्ध खेळलेल्या चारही सामन्यात संधी मिळाली नाही. त्याच्या ऐवजी भारताचा प्रमुख क्रिकेटपटू म्हणून अष्टपैलू रवींद्र जडेजाने सर्व सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले.
महत्त्वाच्या बातम्या-
आयपीएल २०२१: ‘हे’ ३ खेळाडू यूएईमध्ये पाडू शकतात धावांचा पाऊस, एका परदेशी खेळाडूचाही समावेश
भारताची पुढील पिढी घडवणार ‘लेफ्टनंट कर्नल धोनी’, संरक्षण मंत्रालयाने दिली ‘ही’ जबाबदारी
विराट सोडणार टी२० कर्णधारपद; पाहा आत्तापर्यंत कशी राहिली कामगिरी