---Advertisement---

भारताला आफ्रिदी नडला! रोहित, राहुल अन् विराटच्या विकेट घेत दिले मोठे धक्के, पाहा व्हिडिओ

On: सोमवार, ऑक्टोबर 25, 2021 2:20 AM
---Advertisement---

रविवारी (२४ ऑक्टोबर) टी-२० विश्वचषकात सुपर १२ फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील रोमांचक सामना पार पडला. या सामन्याची चाहते मागच्या काही दिवसांपासून आतुरतेने  वाट पाहत होते, अखेर हा सामना पार पडला. पाकिस्तानने या सामन्यात एकही विकेट न गमावता आणि १३ चेंडू शिल्लक ठेऊन मोठा विजय मिळवा आहे. पाकिस्तानच्या शाहीन अफ्रिदीने या सामन्यात त्यांच्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी केली आणि भारताच्या तीन महत्वाच्या विकेट्स घेतल्या.

भारतीय संघाला सामन्यात पहिल्याच घासाला खडा लागला होता. भारताचे सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आणि केएल राहुल संघासाठी काही खास कामगिरी करू शकले नाहीत. पाकिस्तानच्या गोलंदाजीवेळी पहिले षटक टाकण्यासाठी शाहीन अफ्रिदी आला आणि त्याने त्याच्या पहिल्याच षटकाच्या रोहित शर्माचा बळी घेतला. षटकाच्या चौथ्या चेंडूवर रोहित शर्माला त्याने त्याच्या यॉर्कर चेंडूवर पायचीत बाद केले. रोहित संघासाठी एकही धाव करू शकला नाही.

https://www.instagram.com/p/CVagPxDl2VM/

त्यानंतर शाहीनने त्याच्या दुसऱ्या षटकात भारताचा दुसरा सलामीवीर केएल राहुलचा बळी घेतला. राहुल सामन्याच्या तिसऱ्या षटकात शाहीनने टाकलेल्या यॉर्कर चेंडूवरच बाद झाला. शाहीनने टाकलेला चेंडू राहुलच्या बॅटच्या आतमधील बाजूला लागला आणि स्टंप्सवर जाऊन आदळला. राहुलला या सामन्यात केवळ तीन धावा करता आल्या.

https://www.instagram.com/p/CVah-R5la7O/

राहुल आणि रोहितव्यतिरिक्त शाहीनने अजून एक महत्वाची विकेट घेतली, ती म्हणजे भारताचा कर्णधार विराट कोहलीची. विराट जरी शाहीनच्या चेंडूवर बाद झाला असला तरी, त्याने सलामीवीरांच्या तुलनेत चांगले प्रदर्शन केले आहे. त्याने या सामन्यात ४९ चेंडूमध्ये ५७ धावांची खेळी केली आणि भारताला १५१ धावांपर्यंत मजल मारता आली.

https://www.instagram.com/p/CVaroSglvQj/

दरम्यान, भारताने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्ताने एकही विकेट गमावाला नाही आणि सामन्यात सहज विजय मिळवला आहे. पाकिस्तानचे सलामीवीर फलंदाज बाबर आजम आणि मोहम्मद रिझवान हे दोघे सामना संपेपर्यंत नाबाद राहीले आणि संघाला भारताविरुद्ध विश्वचषकातील त्यांचा पहिला विजय मिळवून दिला.

कर्णधार बाबर आजमने ५२ चेंडूत ६८ धावा केल्या. यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि दोन षटकारांचा समावेश आहे. तसेच मोहम्मद रिझवानने ५५ चेंडूत ७९ धवा केल्या, ज्यामध्ये त्याच्या सहा चौकार आणि तीन षटकारांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

कोहलीचा ‘विराट’ कारनामा! आजपर्यंत कोणत्याच भारतीय कर्णधाराला न जमलेला विक्रम केला नावावर

पाकिस्तानविरुद्ध विराटची बॅट तळपतेच! विश्वचषकात ‘असा’ पराक्रम करणारा कोहली जगातील पहिलाच क्रिकेटर

रोहित ‘नो’हिट! पाकिस्तानविरुद्ध शुन्यावर बाद तर झालाच, पण ‘हा’ नकोसा विक्रमही नावावर केला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---