ऑस्ट्रेलियामध्ये पुढच्या महिन्यात टी-20 विश्वचषकात खेळला जाणार आहे. बीसीसीआयने यासाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा देखील केली आहे. या 15 सदस्यी संघाव्यतिरिक्त चार खेळाडू असे आहेत, ज्यांना संघासोबत टी-20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला जाता येणार आहे. या चौघांना विश्वचषकासाठी राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले आहे. संघातील एखाद खेळाडू दुखापतग्रस्त झाला, तर या चौघांपैकी एखाद्याला विश्वचषकात खेळण्याची संधी मिळू शकते.
आयसीसी टी-20 विश्वचषक 2022 ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर 16 ऑक्टोबर पासून सुरू होणार आहे. मोहम्मद शमी (Mohammad Shami), श्रेयस अय्यर (Shreyas Iyer), रवी बिश्नोई (Ravi Bishnoi) आणि दीपक चाहर (Deepak Chahar) यांना राखीव खेळाडूंच्या रूपात विश्वचषक संघासोबत सामील केले गेले आहे. माध्यमांतील वृत्तानुसार निवड समिती, संघ व्यवस्थापन आणि बीसीसीआयने निर्णय घेतला आहे की, हे चारही राखीव खेळाडू संघासोबत ऑस्ट्रेलियासाठी रवाना होतील, जेणेकरून यांच्यातील कोणताही खेळाडू संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये सहभागी होऊ शकेल. 15 सदस्यीय संघातील कोणत्याही वेगवान गोलंदाजाला दुखापत किंवा दुसऱ्या कोणत्या कारणामुळे बाहेर व्हावे लागले, तर शमी आणि चाहर यांचे संघातील स्थान पक्के असेल.
टी-20 विश्वचषकासाठी जेव्हा भारतीय संघ घोषित झाला, तेव्हा मोहम्मद शमीला राखील खेळाडूंमध्ये ठेवल्याचे दिसले. याच कारणास्तव चाहत्यांनी सोशल मीडियावर देखील मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केली. मध्यंतरी अशा बातम्या आल्या होत्या की, संघ व्यवस्थापन टी-20 फॉरमॅटसाठी शमीच्या नावाचा विचार करणार नाहीये. मागच्या जवळपास एक वर्षापासून शमी टी-20 फॉरमॅटमध्ये एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळला नाहीये. त्याने मागच्या वर्षी यूएईत टी-20 विश्वचषकादरम्यान नामिबियाविरुद्ध शेवटचा टी-20 सामना खेळला होता. त्याने मागच्या वर्षीच्या या विश्वचषकात पाच सामन्यांमध्ये 8.84 च्या इकोनॉमीने 140 धावा खर्च करून 6 विकेट्स घेतल्या होत्या. असे असले तरी आयपीएल 2022 मध्ये मात्र त्याचे प्रदर्शन कौतुकास पात्र होते.
दरम्यान, शमीला टी-२० विश्वचषकात जरी राखीव खेळाडूंमध्ये ठेवले गेले असले, तरी त्याआधी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका संघाविरुद्धच्या मालिकांमध्ये त्याला मुख्य संघात सामील केले गेले आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मालिकेत तो टी-20 फॉरमॅटमध्ये पुनरागमन करू शकत होता, परंतु त्याआधीच कोरोनाची लागण झाल्यामुळे त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली. टी-20 विश्वचषक 23 ऑक्टोबर रोजी सुरू होणार असून शेवटचा सामना 13 नोव्हेंबरला खेळला जाईल. भारताला पहिला सामना23 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळायचा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
टी-20 विश्वचषकात भारताला मिळणार ‘या’ गोष्टीचा फायदा, मिचेल जॉन्सनची खास प्रतिक्रिया
‘ब्लू जर्सी’त पुनरागमन करण्यासाठी उमेश यादव तयार, 43 महिन्यांनंतर खेळणार टी-20 मालिका
‘अरे तो खराब फॉर्ममध्ये कधी नसतोच!’, केकेआरच्या दिग्गजाने केले रोहित शर्माचे कौतुक