काही दिवसांपूर्वी भारताचा दिग्गज अष्टपैलू रविंंद्र जडेजा याची मोठी शस्त्रक्रिया झाल्याचे समोर आले आहे. दुखापतीमुळे जडेजा आशिया चषक 2022 मधून बाहेर झाला होता. आगामी टी-20 विश्वचषकात देखील जडेजा खेळू शकणार नाहीये. भारताला टी-20 विश्वचषकात जडेजाची कमी जाणवणार, यात काहीच शंका नाहीये. श्रीलंकेचा माजी दिग्गज कर्णधार माहेला जयवर्धन याच्या मते जडेजा टी-20 विश्वचषकातून बाहेर झाल्यामुळे भारताला तोटा सोसावा लागू शकतो.
आशिया चषक 2022 (T20 World Cup 2022) मध्ये ग्रुप स्टेजमध्ये भारताने अप्रतिम प्रदर्शन केले, पण सुपर फोरमध्ये संघाचा खेळ बघडला होता. हाँगकाँगविरुद्धच्या सामन्यात खेळताना रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja) दुखापतग्रस्त झाला. त्यानंतर अचानकपणे त्याला आशिया चषकातून माघार घ्यावी लागली. जडेजाने माघार घेतल्यामुळे भारताच्या प्लेइंग इलेव्हनचे समीकरण बिघडले. जडेजा शस्त्रक्रियेनंतर आगामी टी-20 विश्वचषकातून बाहेर झाला आहे.
आयसीसी रिव्यूमध्ये बोलत असताना माहेला जयवर्धने (Mahela Jayawadene) याने जडेजाच्या अनुपस्थितीत भारताला नुकसान सोसावे लागू शकते असेल, म्हटले. तो म्हणाला की, “पाचव्या क्रमांकावर खेळण्यासाठी त्याने स्वतःला चांगले फिट केले होते. तो खरोखर चांगली फलंदाज करत आहे. हार्दिक पंड्याही पहिल्या सहामध्ये आहे. अष्टपैलू प्रदर्शन करणाऱ्या या दोघा खेळाडूंमुळे भारताच्या फलेंदाजी क्रमाला खूप लवचिक बनवले आहे.”
“हे त्यांच्यासठी (भारतीय संघ) खूप कठीण असेल. डावखुरा खेळाडू संघात नसल्यामुळे त्यांच्यासाठी ही शक्यतो चिंतेची बाब असेल. त्यांनी दिनेश कार्तिकला बाहेर करून रिषभ पंतला ही भूमिका पार पाडण्यासाठी निवडले आहे, जो 5 किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. या अशा काही गोष्टी आहेत, ज्या त्यांना विश्वचषक खेळण्यासाठी सुधाराव्या लागतील. पण जेडजा ज्या फॉर्ममध्ये होता, अशात तो संघात नसल्यामुळे भारतीय संघाचे नुकसान होईल.”
टी-20 विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), आर. अश्विन, अक्षर पटेल, हार्दिक पंड्या, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह.
राखील खेळाडू –
मोहम्मद शमी, श्रेयस अय्यर, रवी बिश्नोई, दीपक चाहर.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘या’ चौघांमुळे भारताला कसलेचे टेंशन नाही, टी-20 विश्वचषकात अडचणीच्या वेळी येतील कामी
शमीच दुर्दैव पुन्हा आलं आड; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून पत्ता कट
भारतीय हॉकी क्षेत्रात भूकंप! कर्णधार मनप्रीतवर लावले गेले गंभीर आरोप; वाचा सविस्तर प्रकरण