भारतीय क्रिकेट बोर्डाने (बीसीसीआय) 29 मे रोजी जाहीर केले की इंडियन प्रीमियर लीगचे उर्वरित 31 सामने संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये आयोजित करण्यात येतील. यामुळे खेळाडूंसह क्रिकेटप्रेमींमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळत आहे. अशातच भारतात खेळवल्या गेलेल्या सामन्यांत काही दिग्गज गोलंदाजांना आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती, अशा गोलंदाजांना युएईच्या मैदानांवर आपली कर्तबगारी दाखवण्याची चांगली संधी आहे. कारण तेथील वातावरण या गोलंदाजांसाठी पोषक समजलं जातंय.
त्यातच मागीलवर्षी आयपीएल हंगाम युएईमध्येच पार पडला होता. त्यामुळे तो अनुभव देखील गोलंदाजांना महत्त्वाचा ठरणार आहे. युएईत ज्या पाच गोलंदाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत, त्यांचाच आढावा या लेखात घेण्यात आला आहे.
५. ट्रेंट बोल्ट:
मागच्या वर्षी झालेल्या आयपीलमध्ये बोल्टने आपल्या मुंबई इंडियन्ससाठी महत्वाची कामगिरी पार पाडली होती. यूएईच्या मैदानांवर त्याने एकूण 25 बळी घेतले होते, तसेच अंतिम सामन्यात ‘सामनावीर’ पुरस्काराचा मानकरी देखील बोल्ट ठरला होता. गतवर्षीच्या हंगामात बोल्टने जास्तीत जास्त बळी हे पॉवरप्लेच्या षटकांत घेतले होते. त्यामुळेच मुंबईचा संघ प्रतिस्पर्ध्यावर वरचढ ठरत होता.
परंतु, या वर्षी बोल्ट अजूनपर्यंत आपला प्रभाव दाखवू शकला नव्हता आणि एकूण 7 सामन्यांमध्ये फक्त 8 बळी त्याने आपल्या नावावर केले होते. पण आता यावर्षीचा आयपीएल हंगाम युएईला हलवण्यात आला असल्याने त्याच्यासाठी हे फायदेशीर ठरु शकते. युएईच्या मैदानांवर चेंडूला मिळत असलेल्या स्विंग आणि सपाट खेळपट्टीवर बोल्टला आपला सूर सापडू शकतो आणि या उर्वरीत हंगामात तो जास्तीत जास्त बळी घेऊ शकतो.
४. युजवेंद्र चहल:
जर कोणत्या खेळाडूला आपली कामगिरी सुधारण्याची सगळ्यात जास्त आवश्यकता असेल तर तो आहे बंगलोर संघाचा प्रमूख फिरकीपटू युजवेंद्र चहल. मागच्या काही महिन्यांपासून चहल खराब प्रदर्शन करतोय. त्यामुळे त्याला इंग्लंड विरुद्ध झालेल्या टी२० मालिकेत देखील डच्चू देण्यात आला होता. आयपीएल 2021 हंगामात चहलने 7 सामन्यांत केवळ 4 बळी घेतले आहेत. तर गतवर्षीच्या हंगामात युएईमध्ये त्याने 7.08 च्या सरासरीने तब्बल 21 बळी मिळवले होते, त्यामुळे उर्वरित आयपीएल 2021 हंगाम युएईमध्ये होणार असल्याने चहल खुश असेल. जर त्याला आपली कामगिरी सुधारता आली तर भारतीय संघासाठी देखील निश्चितीच चांगली बातमी असले .
३. कागिसो रबाडा
गतवर्षीच्या हंगामात सर्वाधिक बळी मिळवून “पर्पल कॅप” आपल्याकडे राखणाऱ्या कगिसो रबाडाने या वर्षी 7 सामन्यांत 28.50 च्या सरासरीने फक्त 8 बळी घेतले आहेत. मागच्या वर्षी रबाडाने 18.27 च्या सरासरीने विक्रमी 30 बळी मिळवले होते. त्यामुळे संयुक्त अरब अमिरातीमध्ये होणारा उर्वरित आयपीएल 2021 हंगाम या वेगवान गोलंदाजासाठी फायदेशीर ठरू शकतो, कारण युएईच्या मैदानांवर चेंडूला मिळत असलेली अधिक उसळी ह्या गोलंदाजाला बळी घेण्यात मदतगार ठरेल.
२. मोहम्मद सिराज:
मोहम्मद सिराजने ह्यावर्षीच्या आयपीलमध्ये 7 सामन्यात 7.35 च्या सरासरीने 6 बळी घेतले असून त्याने नव्या चेंडूवर जबरदस्त गोलंदाजी करून स्वतःला सिद्ध करून दाखवलंय. सिराजला यूएईच्या गोलंदाजांसाठी पोषक असलेल्या खेळपट्टीचा निश्चितच फायदा होऊ शकतो आणि अधिकाधिक बळी घेण्यात तो यशस्वी होईल. त्याच्या सध्याच्या जबरदस्त कामगिरीमुळे त्याला इंग्लंड दौऱ्यावर ही संधी देण्यात आली आहे
१. जसप्रीत बुमराह
कोणत्याही फलंदाजाच्या पसंती क्रमात असलेला शेवटचा गोलंदाज हा जसप्रीत बुमराह असेल. बुमराहने आयपीलच्या 13 व्या हंगामात च्या खेळपट्टीवर 14.96 च्या जबरदस्त सरासरीने एकूण 27 बळी घेतले होते. पण, यावर्षी धावगती रोखण्यात जरी बुमराह यशस्वी ठरत असला तरी बळी मिळवण्यात तो आघाडीवर नाही. बुमराहला 7 सामन्यांत फक्त 6 फलंदाजांना माघारी धाडण्यात यश आले आहे. पण आता आयपीएल 2021 हंगाम युएईमध्ये हलवल्याने बुमराहसारख्या गोलंदाजाला आपल्या लयीत परतायला वेळ न लागण्याचीच शक्यता आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तयारीस प्रारंभ! गांगुलीसह ‘हे’ अधिकारी दुबईत, उर्वरित आयपीएल आयोजनाबाबत करणार चर्चा
कसोटी अजिंक्यपदाचा किताब कोण पटकावणार? कोहलीच्या प्रशिक्षकांची ‘या’ संघाला पसंती
आयसीसीची १ जून रोजी महत्वपूर्ण बैठक; टी२० विश्वचषक आयोजनासह ‘या’ मुद्द्यांवर होणार चर्चा