ऑकलँड। न्यूझीलंड विरुद्ध भारत संघात आज(24 जानेवारी) पहिला टी20 सामना पार पडला. इडन पार्क येथे झालेल्या या सामन्यात भारताने 6 विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात एक अनोखी गोष्टही पहायला मिळाली.
आज भारत आणि न्यूझीलंडच्या मिळून 5 फलंदाजांनी अर्धशतके झळकावली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच झाले की एका सामन्यात 5 क्रिकेटपटूंनी 50 किंवा त्यापेक्षा अधिक धावांची खेळी केली. याआधी असे कधीही झाले नव्हते.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रो(59), केन विलियम्सन(51) आणि रॉस टेलर(54*) यांनी अर्धशतके करताना न्यूझीलंडला 5 बाद 203 धावसंख्या उभारुन देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला.
तर त्यानंतर 204 धावांचा पाठलाग करताना भारताकडून केएल राहुल(56) आणि श्रेयस अय्यर(58*) यांनी अर्धशतके केली. त्यांच्या अर्धशतकांच्या मदतीने भारताने 204 धावांचे आव्हान 19 षटकात पूर्ण केले.
त्या ४ खेळाडूंमध्ये मुंबईकर श्रेयस अय्यरचेही नाव झाले सामील
वाचा👉https://t.co/E3rVzyLSUX👈#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @ShreyasIyer15— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020
रोहित शर्माने बाउंड्री लाईनजवळ घेतलेला हा भन्नाट झेल पाहिला का? https://t.co/WvxssUnv79#म #मराठी #Cricket #TeamIndia #INDvNZ @ImRo45
— Maha Sports (@Maha_Sports) January 24, 2020