भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत भारताचा युवा खेळाडू इशान किशनने स्वतःची छाप सोडली आहे. त्याने या मालिकेत २ अर्धशतकांच्या मदतीने २०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. या मालिकेतील शेवटचा सामना होऊ शकला नाही, पण पावसाने व्यत्यय आणण्याच्या आधी इशानने फलंदाजी केली. तो या पाच सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला आहे.
इशान किशन (Ishan Kishan) व्यतिरिक्त इतर एकही फलंदाज या टी-२० मालिकेत १५० पेक्षा जास्त धावा करू शकला नाही. त्याने ५ डावांमध्ये २०६ धावा केल्या. अनेक खेळाडू असे होते, ज्यांना शेवटच्या सामन्यात पावसामुळे फलंदाजी करत आली नाही. इशानने मात्र शेवटच्या सामन्यात १५ धावा केल्या. या धावांच्या मदतीने त्याने स्वतःचा २०० धावांचा टप्पा ओलांडला. इशान एकटा फलंदाज आहे, ज्याने या मालिकेत एक पेक्षा जास्त अर्धशतक ठोकले. त्याने या मालिकेत केलेल्या धावा ४१ पेक्षा जास्त सरासरीने आणि १५० पेक्षा अधिक स्ट्राईक रेटसह केल्या आहेत. यामध्ये त्याच्या २१ चौकार आणि ११ षटकारांचाही समावेश होता.
या मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेचा हेन्रिच क्लासेन दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ३ डावांमध्ये ११८ धावा केल्या. हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने चार डावांमध्ये ११७ धावा केल्या. हार्दिकने या धावा एकही अर्धशतक न करता केल्या आहेत. चौथ्या क्रमांकावर रस्सी व्हॅन डर डुसेनचे नाव आहे, ज्याने ९७ धावा केल्या. पाचव्या क्रमांकावर डेविड मिलर आहे, ज्याने दक्षिण आफ्रिकी संघासाठी मालिकेत ९६ धावांचे योगदान दिले. भारतीय सलामीवीर ऋतुराज गायकवाडने देखील मालिकेत मिलर एवढ्याच धावा केल्या आहेत.
पाच सामन्यांच्या या मालिकेतील चार सामने पूर्ण होऊ शकले. शेवचच्या सामन्यात फक्त ३.३ षटकांचा खेळ होऊ शकला. शेवटच्या सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यामुळे मालिकेचा निकाल लागला नाही. भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन्ही संघ २-२ अशा बरोबरीवर राहिले.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
बड्या दिलाचा माणूस! विश्वचषक विजेता क्रिकेटर पेट्रोल पंपावर वाटतोय चहा, कारण कौतुकास्पद
‘सिक्सर किंग’ युवराजने मुलाचे ठेवले हटके नाव, चाहत्यांना दाखवली लाडक्याची झलक; पाहा गोंडस PHOTO
विचारही केला नव्हता, ८ महिन्यांत ६ कर्णधारांसोबत काम करावे लागेल; द्रविडने सांगितला अनुभव