भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाचवा टी२० सामना रविवारी (१९ जून) बंगळूरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जात आहे. या मालिकेत सध्या दोन्ही संघ २-२ च्या बरोबरीवर असल्याने हा सामना महत्त्वाचा आहे. भारताने हा सामना गमावल्यास मालिकाही हातून निसटेल. मात्र, सामना जिंकल्यास पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेला पराभूत केल्यास पहिल्यांदा घरच्या धर्तीवर भारत आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकण्यास यशस्वी ठरू शकतो. तत्पूर्वी भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ६.३० वाजता उभय संघात नाणेफेक झाली असून पुन्हा दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकली आहे. त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली आहे.
सामना सुरू होण्यास काही मिनिटे शिल्लक असताना पावसाने दोन्ही संघाचा हिरमोड केला आहे. सामना सुरू होण्याआधीच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. पुढे जोरात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. त्यामुळे पाऊस आजचा सामना खराब करेल अशी चिन्हे दिसत आहे.
पावसाने वेळ वाया घालवला आणि पूर्ण ४० षटकांचा सामना होऊ शकला नाही, तर मालिकेसाठी महत्वाचा सामना असल्याने नियमाप्रमाणे दोन्ही संघांमध्ये ५-५ षटकांचा सामना होण्याची शक्यता आहे. सामन्याचा निकाल डकवर्श लुईसच्या नियमानुसार लागू शकतो.
जर पाऊस थांबलाच नाहीतर सामन्याचा निकाल लागणार की पाऊस सामना जिंकणार हे पाहावे लागेल. या स्टेडियमच्या ग्राऊंड स्टाफसोबत अंपायर्स चर्चा करत आहेत.
आताच हाती आलेल्या वृत्तानुसार, पाऊस थांबला असून खेळपट्टीवरचे कव्हर्स हटवले आहेत. त्यामुळे सामन्यास निर्धारीत वेळेच्या ३०-४० मिनिटे उशिरा सुरूवात होणार आहे. हा सामना १९ षटकांचा होणार आहे असा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे दोन्ही संघ प्रत्येकी २० ऐवजी १९ षटके खेळणार आहेत.
असे आहेत दोन्हीही संघ
भारत- ऋतुराज गायकवाड, इशान किशन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (यष्टीरक्षक/कर्णधार), हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युझवेंद्र चहल, आवेश खान
दक्षिण आफ्रिका- केशव महाराज (कर्णधार), क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), रिजा हेन्रिक्स, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, ड्वेन प्रिटोरियस, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी, एनरिच नॉर्केया
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारताचं नशीबं गंडलयं राव! पुन्हा एकदा टॉस जिंकत आफ्रिकेचा गोलंदाजी करण्याचा निर्णय
मिताली राजची जागा कोणीही भरून काढू शकत नाही, कर्णधार होताच हरमनप्रीतने केले महत्त्वाचे विधान
दौऱ्यापूर्वी लक्ष्मण यांनी दिला भारतीय संघाला मोलाचा संदेश, बीसीसीआयने फोटो केले शेअर