भारताचा ज्याप्रकारे लोक क्रिकेटपर प्रेम करतात, अगदी त्याच प्रकारे श्रीलंकेत देखील क्रिकेटचे असंख्य चाहते आहेत. अशाच या क्रिकेटच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. श्रीलंकेच्या हंबनटोटामधील महिंद्रा राजपक्षे आंतरराष्ट्रीय स्टेडियमशी संबंधीत ही बातमी आहे. या स्टेडियममध्ये काम करणारे दोन कर्मचाऱ्यांचा हत्तीच्या हल्ल्यामध्ये मृत्यू झाला आहे ( two employees of sri lanka cricket stadium killed in elephant attack ). या दुर्दैवी घटनेनंतर क्रिकेट जगतात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेडियममधील हे दोन्ही कर्मचारी कामावरून घरी परतण्यासाठी निघाले होते, त्यावेळी ही घटना घडली आहे. श्रीलंका क्रिकेटच्या अधिकाऱ्यांनी याबाबत सांगितले की, ही घटना मंगळवारी (७ डिसेंबर) रात्री हंबनटोटाच्या सूरियावेवामध्ये स्थित स्टेडियमच्या बाहेर घडली, जेव्हा दोन कर्मचारी त्यांचे काम संपवून मोटरसाइकलवर घरी परतत होते.
या दोन्ही कर्मचाऱ्यांचे मृतदेह जवळपास ५०० मिटरच्या अंतरावर मिळाले. एका कर्मचाऱ्याचा मृतदेह मोटरसायकलच्या जवळ मिळाला. तर दुसऱ्या कर्मचाऱ्याचा मृतदेह झुडपांजवळ मिळाला. एका पिसाळलेल्या हत्तीने हल्ला केल्यामुळे या दोघांचा मृत्यू झाला. यांच्या मृत्यूमुळे क्रिकेटजगत शोकसागरात बुडाले आहे.
ज्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हे दोन्ही कर्मचारी काम करत होते, त्या स्टेडियमवर लंका प्रीमियर लीगचे अंतिम टप्प्यातील सामने खेळले जाणार आहेत. लंका प्रीमियर लीगचे सामने सुरू होण्याच्या जवळपास एक आठवडा आधी ही दुर्दैवी घटना स्टेडियमपासून जवळच्याच अंतरावर घडली आहे. लंका प्रीमियर लीगचा एलिमिनेटर, क्वालिफायर आणि अंतिम सामना या स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. एलिमिनेटर आणि पहिला क्वालिफायर सामना १९ डिसेंबरला खेळला जाईल.
२०११ मध्ये पार पडलेल्या आयसीसी एकदिवसीय विश्वचषकासाठी महिंद्रा राजपक्षे स्टेडियम (mahindra rajapakse stadium ) उभारण्यात आले होते. हे स्टेडियम ज्याठिकाणी बनवले गेले आहे, त्याठिकाणापासून वन्य जीव अभयारण्य आणि राष्ट्रीय उद्यान खूपच जवळच्या अंतरावर आहे. या स्टेडियमवर अनेक महत्वाचे सामने पार पडले आहेत. २०११ विश्वचषकचा अंतिम सामना याच स्टेडियमवर आयोजित केला होणार होता, पण तो मुंबईच्या वानखडे स्टेडियमवर आयोजित केला गेला होता. भारताने विश्वचषकाच्या या अंतिम सामन्यात श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला होता आणि इतिहासातील दुसरा एकदिवसीय विश्वचषक जिंकला होता.
महत्वाच्या बातम्या –
बीसीसीआयची ‘एक तीर दो निशाण’वाली योजना, वाचा कशामुळे रहाणेकडून काढून घेतलं उपकर्णधारपद?
हार्दिकची वनडेतील जागा धोक्यात! ‘या’ अष्टपैलूने विजय हजारे ट्रॉफीत शतक करत ठोठावलाय टीम इंडियाचं दार