भारताच्या आगामी दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने संघात (Indian Cricket Team) मोठे बदल केले आहेत. विराट कोहलीच्या जागी रोहित शर्मा (rohit sharma) आता एकदिवसीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर अजिंक्य राहणेला देखील कसोटी संघाच्या उपकर्णधारपदावरून पायउतार होण्याची वेळी आली आहे. अजिंक्यच्या जागी रोहित शर्मा आता कसोटी संघाचे उपकर्णधारपद सांभाळणार आहे.
अजिंक्य रहाणे (ajinkya rahane) मागच्या बऱ्याच काळापासून मोठी खेळू शकलेला नाही. त्यामुळे त्याच्याकडून हे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले आहे, असा अंदाज लावला जात आहे. असे असले तरीही, आगामी दौऱ्यासाठी रहाणेला भारतीय संघात संधी दिली गेली आहे.
भारताला तीन कसोटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांसाठी या महिन्यात दक्षिण अफ्रिका दौऱ्यावर जायचे आहे. दौऱ्यात आगोदर कसोटी मालिका खेळली जाईल, ज्याची सुरुवात २६ डिसेंबरपासून होईल. या कसोटी मालिकेत अजिंक्यऐवजी रोहित उपकर्णधार असेल. दरम्यान, रहाणेव्यतिरिक्त कसोटी संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा यांनी देखील मागच्या दोन वर्षात खूपच निराशाजनक प्रदर्शन केले आहे. अशात संघातून रहाणेला एकट्याला बाहेर करणे कितपत योग्य ठरले, असा देखील प्रश्न उपस्थित होत होता.
रहाणेला विदेशात खेळण्याचा चांगला अनुभव आहे आणि त्यामुळे त्याला कसोटी संघात संधी दिली गेली आहे. प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी त्याला या दौऱ्यात शेवटची संधी दिली आहे आणि यावेळी रहाणेला स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे.
रहाणेसह पुजारावरही बीसीसीआयची नजर
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने पीटीआयसोबत बोलताना सांगितले की, “रहाणे कसोटी संघात कायम असण्याचे एक कारण हे आहे की, कोहली आणि पुजारा देखील बऱ्याच काळापासून धावा करू शकलेले नाहीत. अशात कोणा एकाला संघातून बाहेर करणे आणि बाकी दोघांना संघात कायम ठेवणे चुकीचे असेल. कोहली वेगळ्या श्रेणीचा खेळाडू आहे, पण रहाणे आणि पुजारा यांच्यासाठी ही शेवटची संधी असेल.”
दक्षिण अफ्रिका दौऱ्यासाठी भारताचा कसोटी संघ –
विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रिधिमान साहा, आर अश्विन, जयंत यादव, ईशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह और शारदुल ठाकुर.
स्टँडबाय: नवदीप सैनी, सौरभ कुमार, अर्जन नागवासवाला आणि दीपक चाहर.
महत्वाच्या बातम्या –
ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेडची कसोटीत वनडेप्रमाणे खेळी..! तेज तर्रार शतकासह बनला ‘विक्रमवीर’
हार्दिकची वनडेतील जागा धोक्यात! ‘या’ अष्टपैलूने विजय हजारे ट्रॉफीत शतक करत ठोठावलाय टीम इंडियाचं दार
इंग्लंडच्या खराब कामगिरीनंतर दिग्गजाने उपस्थित केले ‘काऊंटी क्रिकेट सिस्टिम’वर प्रश्नचिन्ह