भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023 चा अंतिम सामना खेळला जाणार आहे. या अंतिम सामन्यात दोन्ही संघाच्या काही खेळाडूंवर सर्वांच्या नजरा असणार आहेत. भारतीय संघाची फलंदाजी प्रामुख्याने सर्वच अनुभवी फलंदाजांवर अवलंबून आहे. केवळ शुबमन गिल वगळल्यास फाईव्ह मधील भारताचे सर्व फलंदाज कमीत कमी तीन मालिका इंग्लंडमध्ये खेळले आहेत. मात्र, या सर्वांची आकडेवारी पाहून भारतीय चाहत्यांना धक्का बसू शकतो.
हा अंतिम सामना ज्या केनिंग्टन ओव्हल मैदानावर होणार आहे, त्या मैदानावरील विराट कोहली, चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांची कामगिरी अत्यंत खराब राहिली आहे. या मैदानावर रहाणे याची सरासरी 9.16 इतकी खराब आहे. त्यानंतर चेतेश्वर पुजाराने या मैदानावर केवळ 19.5 अशा सरासरीने धावा केल्या आहेत. भारताचा सर्वात अनुभवी फलंदाज विराट कोहली हा देखील 26.16 यापेक्षा अधिक सरासरीने धावा करू शकला नाही.
विराटची या मैदानावरील आकडेवारी खराब असली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने नेहमीच दमदार प्रदर्शन केले आहे. कसोटी क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याची सरासरी 48.26 अशी दमदार होते. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध आत्तापर्यंत 24 सामन्यात 1979 इतक्या धावा केल्या आहेत.
दुसऱ्या बाजूने पुजारा याची इंग्लंड मधील सरासरी 29.20 असली तरी, ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याची आत्तापर्यंत सरासरी 50 पेक्षा अधिक राहिली आहे. याबरोबरच तो नुकताच इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळत होता. त्यामुळे या परिस्थितीचा त्याला चांगला फायदा होईल. पुनरागमन करत असलेल्या अजिंक्य रहाणे याची ऑस्ट्रेलियाविरुद्धची सरासरी 17 सामन्यांत 37.58 अशी राहिली आहे. यामध्ये त्याने 1090 धावा केल्या. त्याचवेळी, त्याची इंग्लंडमधील सरासरी 26.03 इतकीच आहे. त्यामुळे या अंतिम सामन्यात भारतीय संघाला या तिघांवर जास्त अवलंबून राहता येणार नाही.
(Virat Kohli Ajinkya Rahane And Cheteshwar Pujara Stats In England And Against Australia Ahead WTC Final)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘त्या’ एका फोनमुळे हुकलं होतं सेहवागचं पदार्पण, नाहीतर शारजाहमध्ये आलं असतं वादळ
खेळाडूंवर आंतरराष्ट्रीय क्रिकेटची एकाधिकारशाही आयपीएलमुळे संपली! डब्ल्यूटीसी फायनलआधी पॅट कमिन्सचे मोठे भाष्य