सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात चीनमधील हॅंगझू येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी भारतीय संघाचे नेतृत्व महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे. त्यानंतर आता या स्पर्धेसाठी मुख्य प्रशिक्षकांची घोषणा करण्यात आली असून, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे संचालक व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय संघाचे मार्गदर्शक असतील.
हॅंगझू येथे होणाऱ्या 19 व्या एशियन गेम्स स्पर्धेत भारतीय संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. भारतीय संघ या स्पर्धेत विजेतेपद मिळवण्याची दाट शक्यता आहे. भारताचा मुख्य संघ विश्वचषकाची तयारी करत असल्याने या स्पर्धेसाठी सर्व युवा खेळाडू चीनला जातील. त्यामुळे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा देखील लक्ष्मण हेच सांभाळतील. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या अनुपस्थितीत लक्ष्मण हे अनेकदा भारतीय संघासोबत असतात.
या स्पर्धेत भारतीय संघ सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. भारतीय संघातील खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेट तसेच आयपीएलचा मोठा अनुभव असून, भारताला सलग तीन सामने जिंकून सुवर्णपदक आपल्या नावे करता येईल. या स्पर्धेसाठी निवडलेल्या भारतीय संघात जिथे शर्मा वगळता सर्व क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव आहे. त्यामुळे भारताचे पारडे जड मानले जातेय.
एशियन गेम्ससाठी भारतीय संघ-
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, शिवम मावी, शिवम दुबे, प्रभसिमरन सिंग.
स्टँडबाय: यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा, साई सुदर्शन
(VVS Laxman Will Be Head Coach Of Team India In Asian Games)
महत्वाच्या बातम्या-
‘मी जे पाहिलंय, त्यावरून हे स्पष्ट आहे…’, विराटच्या बॅटिंगविषयी माजी कोचचे सनसनाटी वक्तव्य
बोंबला! World Cup 2023 तिकीट विक्रीच्या पहिल्याच दिवशी वेबसाईट क्रॅश, भारतीय सामन्यांची बुकिंग कधी?