रोहित शर्माने अचानक कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांनाच धक्का दिला आहे. तो फक्त ह्या फॉरमॅटमध्ये खेळत नव्हता तर तो कर्णधार सुद्धा होता. आशा होती की, आयपीएल 2025 नंतर इंग्लंड दौऱ्यावर क्रिकेट खेळण्यासाठी जाईल. पण त्याच्या निवृत्तीमुळे आता मोठा प्रश्न उपस्थित होत आहे की भारतीय कसोटी संघाचा पुढचा कर्णधार कोण असेल? याविषयी दिग्गजांनी त्यांचे मत स्पष्ट केले आहे.
भारतासाठी 67 कसोटी सामने खेळलेल्या रोहित शर्माने शेवटचा कसोटी सामना डिसेंबर 2024 ऑस्ट्रेलिया विरुद्ध मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला होता. बॉर्डर गावस्कर मालिकेत त्याने एकही सामना खेळला नाही. ज्यानंतर त्याच्या निवृत्तीच्या चर्चांना उधाण आलं होतं. आता त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे तसेच स्पष्ट केले आहे की तो वनडेमध्ये खेळणे सुरू ठेवेल. या आधी त्याने टी20 मधून निवृत्ती घेतली आहे.
सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, ज्या संबंधित बीसीसीआयला लवकरच घोषणा करावी लागेल. कारण IPL नंतर संघाला इंग्लंड दौऱ्यावर जायचे आहे. भारताच्या कसोटी क्रिकेटमधील पुढच्या कर्णधाराच्या स्वरूपात जसप्रीत बुमराह, शुबमन गिल यांचं नाव सर्वात आधी समोर येत आहे. यामध्ये के एल राहुल सुद्धा आहे. ज्याने कसोटी फॉरमॅटमध्ये भारताचे नेतृत्व केले आहे.
आयपीएल 2025 मध्ये कोलकत्ता विरुद्ध चेन्नई सामन्यादरम्यान कॉमेंट्री करताना हरभजन सिं ने त्याच्या आवडत्या खेळाडूला म्हणजेच जसप्रीत बुमराहची निवड केली. ते म्हणाले, बुमराहने पुढचा कसोटी कर्णधार व्हायला हवे.
हरभजन सिंगने म्हटले, रोहित शर्मा एक दिग्गज आणि मोठा खेळाडू आहे. जर तो नसेल तर माझ्या अंदाजाने बुमराह योग्य आहे.
त्यानंतर आकाश चोपडा म्हणाले, सिडनी कसोटीमध्ये दुखापत झाली आणि जसप्रीत बुमराह निघून गेला. तो 2- 3 महिने बाहेर होता. माहित नाही निवडकर्ते कशा पद्धतीने विचार करतात. तो पाच सामने खेळेल की नाही किंवा वर्कलोड मॅनेजमेंटसाठी तुम्ही त्याला तीन-चार सामने खेळवणार. त्यानंतर ब्रेक दिला जाईल. नाहीतर तो पूर्णपणे आदर्श आहे, त्याच्या सारखं दुसरं कोणीही नाही.
संजय बांगरने म्हटले, जसप्रीत बुमराहला कर्णधार बनवलेच पाहिजे, कारण तो कर्णधार पदासाठी रेसमध्ये होता. के एल राहुल कर्णधार पदासाठी योग्य पर्याय आहे.






