भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील तिसरा कसोटी सामना गुरुवार पासून सुरू झाला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचबरोबर तिसर्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलिया संघाने वर्चस्व निर्माण केले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघाला फक्त 2 गडी बाद करता आले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 55 षटकांच्या समाप्तीनंतर 2 बाद 166 धावा केल्या.
ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात थोडीशी खराब झाली. मात्र त्यानी पटकन सुधारणा करत पहिल्या दिवसाच्या खेळात आपले वर्चस्व निर्माण केले. डेविड वॉर्नर बाद झाल्यानंतर पदार्पणाचा सामना खेळणाऱ्या विल पुकोवस्की आणि मार्नस लाब्यूशाने या दोघांनी डाव सावरताना दुसर्या गड्यासाठी 100 धावांची भागीदारी केली. यामध्ये विल पुकोवस्कीने 62 धावांची खेळी केली. त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि मार्नस लाब्यूशाने हे अनुक्रमे 31 आणि 67 धावांवर नाबाद आहेत.
पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलिया संघाने खास फलंदाजी केली नाही. मात्र भारतीय संघाने केलेल्या दोन चुकांमुळे ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवशी वर्चस्व प्रस्थापित केले. त्यामुळे आज आपण या दोन चूकांबद्दल जाणून घेणार आहोत.
1. रिषभ पंतने विल पुकोवस्कीचे दोन झेल सोडले
आपल्या कसोटी कारकिर्दीतील पहिला सामना खेळणाऱ्या विल पुकोवस्की 62 धावांची खेळी. मात्र ही खेळी त्याने आपल्याला मिळालेल्या जीवनदानाच्या जोरावर केली. त्याचे रिषभ पंतने दोन झेल सोडले होते. सर्वात पहिल्यांदा झेल रिषभ पंतने आश्विनच्या गोलंदाजीवर सोडला. त्यानंतर दुसर्यांदा त्याने मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर दुसरा झेल सोडला.
रिषभ पंतने पहिला झेल 21.6 षटकात आश्विनच्या गोलंदाजीवर सोडला तेव्हा विल पुकोवस्की 69 चेंडूचा सामना करताना 26 धावांवर खेळत होता. अश्विनचा हा चेंडू विल पुकोवस्कीच्या बॅटची कडा घेवून मागे गेला होता. रिषभ पंतच्या ग्लोव्सला लागल्यानंतर हा झेल सुटला. त्यानंतर अश्विन नाराज दिसून आला.
त्यानंतर 24.6 षटकात मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर रिषभ पंतने पुन्हा एकदा दुसरा झेल सोडला. यावेळी वाटले त्यांनी झेल घेतला आहे. परंतु टीव्ही पंचाने रिप्ले मध्ये पाहिले. तेव्हा दिसून आले की रिषभ पंतने चेंडू जमिनीवरून उचला आहे. यावेळी विल पुकोवस्की 80 चेंडूचा सामना करून 32 धावांवर खेळत होता. त्याचबरोबर आता हे दोन झेल सोडणे भारतावर भारी पडताना दिसत आहे.
2. ऑस्ट्रेलिया संघाला वेगाने धावा करू दिल्या
ऑस्ट्रेलिया संघ या सामन्यात एका वेगळ्या रणनितीने उतरलेला दिसला. ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा 55 षटकांत 2 गडी गमावून 166 धावा केल्या. या डावात ऑस्ट्रेलिया संघाची सुरुवात खराब झाली. डेविड वॉर्नर 5 धावांवर बाद झाला. तेव्हा संघाची धावसंख्या 6 होती. तेथून पुढे मार्नस लाब्यूशाने आणि विल पुकोवस्की या दोघांनी संघाचा डाव सावरला.
त्याचबरोबर स्टीव्ह स्मिथने सुद्धा भारतीय गोलंदाजावर आक्रमण केले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाने 50 पासून 100 धावा फक्त 58 चेंडूत केल्या. त्यानंतर 100 पासून 150 धावा फक्त 62 चेंडूत केल्या. स्टीव्ह स्मिथने फलंदाजीला आल्या आल्या अश्विन दबाव टाकत धावा करण्यास सुरुवात केले. त्याचबरोबर नवदीप सैनी समोर आक्रमक खेळी करताना धावा काढल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
… म्हणून ट्रॅविस हेडला संघात स्थान नाही, कर्णधार टीम पेनची स्पष्टोक्ती
“विराट कोहलीच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कामगिरीची पुनरावृत्ती करणे अतिशय अवघड”
काय सांगता! रोहितने आत्तापर्यंत विराट शिवाय खेळला नव्हता एकही कसोटी सामना