तब्बल 1.4 अब्ज असलेला आपला महाकाय देशात क्रिकेटला एक धर्म मानला जातो आणि खेळाडू देवाप्रमाणे पुजले जातात. क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न भारतीय संघात खेळण्याच असतं आणि त्यातही संघात सामील झालेल्या क्वचित खेळाडूंना कर्णधारपद भूषविण्याची संधी मिळते.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात काही कर्णधारांचा विक्रम चांगला राहिला आहे आणि त्यांची कामगिरी नक्कीच कौतुकास पात्र आहे. कपिल देव, सौरव गांगुली, महेंद्रसिंग धोनी यांची नाव यशस्वी भारतीय कर्णधारात सर्वात अगोदर घेतली जातात. राहुल द्रविड आणि अनिल कुंबळे यांना जास्त वेळ कर्णधारपदी राहण्याची संधी मिळाली नाही. पण जितका वेळ त्यांनी नेतृत्व केले, त्यात त्यांना बऱ्यापैकी यश मिळाले.
त्याचप्रमाणे काही दिग्गज खेळाडू आहेत, ज्यांना आत्तापर्यंत कधीही भारताचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली नाही. या लेखात अशा काही दिग्गज खेळाडूंचा नामोल्लेख केलाय ज्यांना भविष्यात कर्णधारपद मिळण्याची शक्यता कमी आहे.
1) चेतेश्वर पुजारा :- भारतीय कसोटी क्रिकेटची नवी भिंत म्हणून ज्याचं वर्णन केले जाते, असा राहुल द्रविडचा खऱ्या अर्थी वारसदार असलेल्या पुजाराला आतापर्यंत कधीच कर्णधारपद भूषविता आलेलं नाही आणि कदाचित भविष्यातही त्याला तशी संधी मिळणार नाही. 85 कसोटी सामने आणि 5 एकदिवस सामने खेळलेल्या पुजारा आज 33 वर्षाचा आहे आणि विराट कोहली सध्या यशस्वीरित्या भारतीय संघाचे कर्णधारपद सांभाळतोय. त्यामुळे पुजाराला ही संधी मिळण्याची शक्यता नाही.
2) रवीचंद्रन अश्विन :- दिग्गज भारतीय फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनलासुद्धा आतापर्यंत कर्णधारपद लाभलेले नाही. अश्विन एकूण 78 कसोटी सामन्यात भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलेलं आहे तर एकदिवस क्रिकेटमध्ये त्यांच्या नावे 111 सामने आहेत आणि आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावे 46 सामने आहेत. तो देखील आता 34 वर्षांचा असल्याने त्याला कर्णधारपद मिळण्याची शक्यता नाही.
3) रवींद्र जडेजा:- भारतीय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात प्रतिनिधित्व करणारे रवींद्र जडेजाला सुद्धा कर्णधारपदाची संधी मिळालेली नाही. जाडेजाने एकूण 51 कसोटीत भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केले आहे, तर एकूण 168 एकदिवस सामने त्याने भारताकडून खेळले आहे आणि 20 षटकांच्या एकूण एकूण 50 सामन्यात या 32 वर्षीय खेळाडूने भाग घेतलाय. तसेच त्याला पुढेही भारतीय संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळण्याची शक्यता कमी आहे. कारण कर्णधारपदासाठी सध्या भारतीय संघात केएल राहुल, श्रेयस अय्यर, रिषभ पंत असे काही युवा खेळाडू दावेदार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
विस्डेनने निवडला सर्वकालीन भारतीय कसोटी संघ; सेहवाग-धोनीला डच्चू, तर ‘हा’ खेळाडू असेल कर्णधार
स्पर्धा स्थगितीचा सिलसिला सुरुच! कोरोनामुळे आयपीएलनंतर ‘ही’ मोठी टी२० लीग ढकलली पुढे
मोठी बातमी! दोन वेळचा ऑलिंपिक पदक विजेता सुशील कुमारला सागर धनखड हत्येप्रकरणी अखेर अटक