कोणत्याही खेळात खेळाडू चांगली कामगिरी व्हावी याचसाठी झटत असतो. याला क्रिकेटही अपवाद नाही. प्रत्येक क्रिकेटपटू आपल्या संघासाठी महत्त्वाचे योगदान देण्याचा प्रयत्न करत असतो. पण कधीतरी त्याला यात अपयश येते. हे अपयश सातत्याने आले तर त्याच्यावर टिका व्हायला सुरुवात होते. एवढेच नाही तर बऱ्याचवेळा जेव्हा एखाद्या क्रिकेपटूच्या हातून मैदानात काही चूक झाली. कोणत्याही दुसऱ्या क्रिकेटपटूसह शाब्दिक चकमक झाली तर त्याबद्दलही क्रिकेटवर्तुळात चर्चा झालेली दिसते. अशावेळी अनेकदा क्रिकेटपटू थेट शब्दांनी उत्तर देण्यापेक्षा त्यांच्या दमदार कामगिरीने उत्तर देणे पसंत करतात. अशाच 5 घटनांचा या लेखात आढावा घेतला आहे, ज्यात खेळाडूंनी काही न बोलता टीकाकारांना त्यांच्या खेळाने उत्तर दिले.
५. संजय मांजरेकर – रवींद्र जडेजा
भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि माजी क्रिकेटपटू व समालोचक संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांच्यातील २०१९ च्या विश्वचषकादरम्यानच्या वादाची बरीच चर्चा झाली.
खरं तर, विश्वचषक २०१९ मध्ये कर्णधार विराट कोहलीने रवींद्र जडेजाला सराव सामन्यानंतर एकही साखळी सामन्यात अंतिम अकरा जणांच्या संघामध्ये सामील केले नाही.
या विश्वचषकादरम्यान मांजरेकरांनी ‘थोडी थोडी कामगिरी करणारा खेळाडू (बिट्स अँड पीसेस)’, असे जडेजाच्या बाबतीत बोलताना म्हटले होते.
त्यावर जडेजाने ट्विट करत सडेतोड प्रतिउत्तर दिले होते. जडेजाने ट्विट केले होते की ‘तूम्ही खेळलेल्या सामन्यांपेक्षा मी दुप्पट सामने खेळले आहेत आणि मी अजूनही खेळत आहे. ज्यांनी काहीतरी मिळवले आहे त्यांचा आदर करण्यास शिका. तूमच्या वक्तव्यांबद्दल मी खूप ऐकले आहे.’
एवढेच नाही तर जेव्हा न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या उपांत्य सामन्यात जडेजाला अंतिम आकारामध्ये संधी दिली. तेव्हा जडेजाने त्या संधीचा फायदा घेत स्फोटक फलंदाजी केली. त्याने 6 बाद ९२ धावा अशा परिस्थितीत भारत असताना ८ व्या क्रमांकावर फलंदाजीला येत ७७ धावांची तुफानी खेळी केली होती. या खेळीने भारतीय संघात विजयाची आशा निर्माण केली. पण आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यात तो अयशस्वी ठरला.
भारताला विजय मिळला नसला तरी जडेजाने त्या खेळीने टिकाकारांची बोलती बंद केली होती. त्या खेळीनंतर जडेजा भारताच्या तिन्ही प्रकारच्या क्रिकेट संघात नियमित खेळतानाही दिसून आला.
४. हार्दिक पांड्या आणि मायकेल होल्डिंग
२०१८ मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौर्यावर गेला होता आणि हार्दिकने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये गोलंदाजीमध्ये अत्यंत निराशाजनक कामगिरी केली होती.
चार डावांमध्ये अवघ्या तीन विकेट घेण्यात तो यशस्वी ठरला आणि इंग्लिश फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजीवर खूप धावा केल्या. त्या वेळी कपिल देव (Kapil Dev) याच्याशी अष्टपैलू हार्दिक पांड्याची सतत तुलना केली जात होती. यावर मायकल होल्डिंगने पांड्याबद्दलच्या प्री मॅच शो दरम्यान सांगितले की, “हार्दिक हा कपिलसारखा नाही. गोलंदाजीमध्ये काही वेगळेपण असेल असं मला वाटत नाही. तो सातत्यपूर्ण कामगिरी करण्यात सक्षम नाही.”
होल्डिंगच्या विधानानंतर इंग्लंड आणि भारत यांच्यात तिसरा कसोटी सामना ट्रेंट ब्रिज येथे खेळला गेला. या सामन्यात हार्दिक पांड्या आपल्या फॉर्ममध्ये आला आणि त्याने त्याच्या कसोटी कारकीर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी करत पाच बळी घेतले. सामना संपल्यानंतर हार्दिक म्हणाला की,
“मला फक्त हार्दिक पांड्या होऊ दे, मी फक्त हार्दिक पंड्याच चांगला आहे. मी आत्तापर्यंत ४१ वनडे आणि १० कसोटी सामने खेळले आहेत तसेच मी हार्दिक पांड्या आहे, कपिल देव नाही.”
३. जोफ्रा आर्चर – टिनो बेस्ट
कोरोनामहामारी दरम्यान क्रिकेट पुन्हा सुरु झाले आहे आणि त्याच पुनरागमन अत्यंत जोरात आणि शानदार झाले. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात साऊथॅम्प्टन येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला. याच कसोटी सामन्यादरम्यान जोफ्रा आर्चर आणि टीनू बेस्ट यांच्यात सोशल मीडियावर मोठा वाद पाहायला मिळाला.
खरं तर, साऊथॅम्प्टन कसोटीत इंग्लंडने स्टुअर्ट ब्रॉडलाच्या जागी आर्चरला अंतिम आकारामध्ये स्थान दिले. त्यानंतर वेस्ट इंडीजचा माजी वेगवान गोलंदाज टीनू बेस्टने ट्विट करुन लिहिले की,
“ब्रॉडच्या जागी आर्चर का खेळत आहे कारण वुड ९० पेक्षा जास्त वेगवान गोलंदाजी करीत आहे. तो ब्रॉडप्रमाणेच वेगवान गोलंदाजी करीत आहे. ब्रॉड रागावला असेल तर मला काही हरकत नाही.”
बेस्टच्या या ट्विटनंतर जोफ्रा आर्चरने त्यांना प्रत्युत्तर देत ट्विटरवर लिहिले की, “एवढी बरीच माहिती असूनही आपण अद्याप कोच का झाला नाही?”
त्यानंतर त्या सामन्यात दुसऱ्या डावात आर्ररने आपल्या गोलंदाजीचा करिष्मा दाखवत तीन गडी बाद केले.
२. विराट कोहली आणि पॅट कमिन्स
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या आक्रामकतेबद्दल सर्वजण परिचित आहोत. विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा स्फोटक गोलंदाज पॅट कमिन्स जेव्हा समोरासमोर येतात तेव्हा सामन्यातील रंगत बघायला मिळते.
अशीच एक घटना सन २०१८ मध्ये झाली. भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर गेला होता. खरं तर, भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौर्यावर पोहोचण्यापूर्वी कमिन्सनी एका निवेदनात म्हटले की, “या दौर्यावर विराट एकही शतक ठोकणार नाही आणि भारत मालिका न जिंकताच माघारी परतेल.”
परंतु, यानंतर भारतीय संघाने अतिशय दमदार खेळ दाखवत प्रथमच ऑस्ट्रेलियामध्ये ऑस्ट्रेलियावर २-१ अशी कसोटी मालिकेच्या विजयाची नोंद केली. या विजयानंतर भारतीय संघाने तीन वनडे सामन्यांची मालिकाही आपल्या नावावर केली. या दौऱ्यात विराटने 2 शतके आणि 3 अर्धशतके केली होती.
१. दिनेश रामदीन आणि व्हिव्हियन रिचर्ड्स
२०१२ मध्ये वेस्ट इंडीजचा संघ इंग्लंडला कसोटी मालिका खेळण्यासाठी गेला होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यात दिनेश रामदिन फलंदाजीमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला आणि त्याने अनुक्रमे- ६, ४३, १ आणि ६ धावा केल्या.
त्याच्या या फलंदाजीवर व्हिव्हियन रिचर्ड्सने बोलले की, “मी जसा विचार केला होता रामदिन हा तसा खेळाडू नाही. जेव्हा त्याने वेस्ट इंडिजकडून खेळण्यास सुरुवात केली, तेव्हा मला वाटले की तो एक मोठा खेळाडू होईल पण तसे झाले नाही. इतक्या मोठ्या स्तरावर तो स्वत: ला सिद्ध करणार, तो थकलेला खेळाडू आहे.”
रिचर्ड्सने इतके बोलल्यानंतर रामदीनने एजबॅस्टन कसोटी सामन्यात नाबाद १०७ धावा करून चांगलेच उत्तर दिले. शतक झळकावल्यानंतर दिनेश रामदिनने खिशातून एक कागद काढला आणि दोन्ही हातांनी धरून उभा राहिला. त्यावर लिहले होते, “येस विव आता बोला…”
वाचनीय लेख –
६८ वर्षांपूर्वी भारताने केवळ २२३ मिनिटांत दोन वेळा धरला होता तंबूचा रस्ता
चांगले फलंदाजी तंत्र नसतानाही आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलेले ५ फलंदाज
क्रिकेट विश्वचषकाच्या गाजलेल्या जाहिराती, ज्या तुम्हाला आठवण करुन देतात तुमचं बालपण