भारतातील सर्वात मोठी टी२० लीग असणाऱ्या आयपीएलमध्ये असे अनेक कर्णधार होते, ज्यांनी आपल्या नेतृत्वात संघाला विजेतेपद मिळवून दिले. ते कर्णधार आजही सर्वांच्या लक्षात आहेत. याव्यतिरिक्त असेही काही कर्णधार होते, ज्यांची कामगिरी म्हणावी तितकी चांगली नव्हती. त्यामुळे त्यांनी आपले कर्णधारपद सोडले.
आज या लेखात आपण अशाच ५ कर्णधारांचा आढावा घेणार आहोत. ज्यांनी आयपीएल दरम्यान आपल्या संघाच्या हितासाठी मधूनच कर्णधारपदाचा त्याग केला.
आयपीएलदरम्यान कर्णधारपदाचा त्याग करणारे ५ कर्णधार- (5 Captains who leave his captainship in the mid of IPL)
५. रिकी पाँटिंग-
आयपीएलमध्ये सुरुवातीच्या ५ मोसमात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात मोठ-मोठे दिग्गज असूनही संघाला विजेतेपद मिळवता आले नाही. यामध्ये पहिल्या ४ मोसमात अनुक्रमे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग, शॉन पोलाक आणि ड्वेन ब्रावो या खेळाडूंनी मुंबई इंडियन्सने नेतृत्व केले होते.
मुंबईच्या ५व्या कर्णधाराच्या रुपात आयपीएल २०१३च्या लिलावात मुंबईने रिकी पाँटिंगला (Ricky Ponting) विकत घेतले होते. मुंबईचे चाहते पाँटिंगला आपला कर्णधार म्हणून पाहण्यासाठी उत्साहित होते.
पाँटिंगच्या नेतृत्वात मुंबईने २०१३ च्या सुरुवातीच्या ४ सामन्यांपैकी ३ सामन्यात विजय मिळविला. परंतु फलंदाज म्हणून त्याची कामगिरी फार चांगली नव्हती. त्याचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट प्रकारानुसार स्ट्राईक रेट फार कमी होता. त्यामुळे पाँटिंगने आपला खराब फॉर्म पहाता मध्यातूनच कर्णधारपदाचा त्याग केला आणि मुंबईचे नेतृत्व रोहित शर्माकडे सोपविले.
यानंतर मुंबईने रोहितच्या नेतृत्वात आयपीएलचे ४ विजेतेपद आपल्या नावावर केले. मुंबई इंडियन्स संघ आयपीएलमधील आतापर्यंतचा सर्वात यशस्वी संघ आहे.
४. गौतम गंभीर-
दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) आयपीएल २०१८ मध्ये आपल्या संघात अनेक बदल केले. तसेच काही महत्त्वाचे निर्णयही घेतले. दिल्लीने घरचा खेळाडू गौतम गंभीरला (Gautam Gambhir) कर्णधारपद सोपविले. तसेच संघ सांभाळण्याची जबाबदारीही दिली. गंभीरने आपल्या पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकले. परंतु यानंतरच्या ५ सामन्यात त्याला केवळ ३० धावाच करता आल्या. दिल्ली संघाने सुरुवातीच्या ६ सामन्यातील ५ सामन्यांमध्ये पराभवाचा सामना केला.
संघाच्या खराब कामगिरीमुळे गंभीरने २०१८मध्ये कर्णधारपद सोडले आणि युवा क्रिकेटपटू श्रेयस अय्यरकडे संघाचे नेतृत्व सोपविले. अय्यरच्या नेतृत्वात दिल्लीने २०१९च्या मोसमात चांगली कामगिरी केली आणि प्लेऑफमध्ये प्रवेश केला.
३. डेनियल विटोरी-
आयपीएलच्या सुरुवातीच्या पहिल्या ३ वर्षांपर्यंत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरमध्ये (Royal Challengers Bangalore) दर्जेदार कसोटीपटू अधिक होते. बेंगलोर संघाने २०११मध्ये एबी डिविलियर्स, तिलकरत्ने दिलशान आणि डेनियल विटोरी (Daniel Vettori) यांसारख्या उत्कृष्ट टी२० खेळाडूना विकत घेतले होते. संघ व्यवस्थापनाने न्यूझीलंडचा फिरकीपटू गोलंदाज विटोरीला संघाचा कर्णधार म्हणून निवडले. आरसीबीने त्या मोसमाच्या अंतिम सामन्यापर्यंतचा प्रवास केला. परंतु त्यांना चेन्नईविरुद्ध पराभव स्विकारावा लागला.
आयपीएल २०१२मध्ये कर्णधार विटोरीची कामगिरी खराब होती. तो मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेण्यात अपयशी ठरत होता. तर दुसरीकडे त्याचा संघसहकारी मुरलीधरन संघासाठी चांगली कामगिरी करत होता. अकरा जणांच्या संघात ४ खेळाडूंच्या नियमांमुळे विटोरीने स्वत:ला वगळले आणि त्यानंतर बेंगलोरचे कर्णधारपद विराट कोहलीला (Virat Kohli) सोपविण्यात आले.
२. कुमार संगकारा-
भारतीय नियामक मंडळाने (बीसीसीआय) २०१२मध्ये आयपीएल फ्रंचायझी डेक्कन चार्जर्स (Deccan Chargers) संघाला काढून टाकले होते. परंतु या संघातील खेळाडूंना सनरायजर्स हैद्राबाद (Sunrisers Hyderabad) या नवीन संघात कायम करण्यात आले होते. या संघाचा कर्णधार म्हणून कुमार संगकाराला (Kumar Sangakkara) निवडण्यात आले होते. हैद्राबादने सुरुवातीच्या ७ सामन्यांपैकी ५ सामन्यांमध्ये विजय मिळविला होता. या विजयामागील कारण हे गोलंदाजांची चांगली कामगिरी होती.
संघाचा फलदाज आणि कर्णधार संगकाराची कामगिरी खराब होती. संगकाराने ९ डावांमध्ये केवळ १२० धावा केल्या होत्या. तसेच प्लेऑफच्या शर्यतीत आपला संघ टिकून राहण्यासाठी संगकाराने स्वत: अकरा जणांच्या संघातून बाहेर पडला होता. त्यानंतर हैद्राबाद संघ कॅमेरॉन व्हाईटच्या नेतृत्वात शेवटी ४ पैकी ३ सामन्यात विजय मिळवत प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता.
१. शिखर धवन-
आयपीएलमधील फ्रंचायझी सनरायजर्स हैद्राबाद संघाने २०१४मधील लिलावात केवळ शिखर धवन (Shikhar Dhawan) आणि डेल स्टेन (Dale Steyn) या २खेळाडूंना संघात ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर यादरम्यान डेव्हिड वॉर्नर, ऍरॉन फिंच, केएल राहुल आणि भुवनेश्वर कुमार यांसारख्या उत्कृष्ट खेळाडूंना विकत घेतले होते.
त्यावेळी धनवला संघाचा कर्णधार म्हणून निवडण्यात आले होते. हैद्राबादकडे एक मजबूत संघ होता. तसेच त्या मोसमात चांगली कामगिरी करण्याची आशा देखील होती.
कर्णधारपदाचा दबाव असल्यामुळे धवनला चांगली कामगिरी करत येत नव्हती. याचा परिणाम त्याच्या संघावर झाला. आपली खराब कामगिरी पहाता धवनने कर्णधारपदाची जबाबदारी मोसमाच्या अर्ध्यातूनच डॅरन सॅमीकडे सोपविली होती. तराही संघाला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे संघाला या शर्यतीतून बाहेर पडावे लागले.
आयपीएल स्पर्धेवरील काही खास लेख
–विशेष लेख: खरंच गेल्या १२ वर्षात आयपीएलमुळे एकंदरीतच आयुष्य, क्रिकेट खूप(च) बदलून गेलं नै
–जगातील टाॅप ५ श्रीमंत क्रिकेट लीग, जिथे क्रिकेटर्स होतात करोडपती
–आयपीएलच्या संघमालकांची यादी; चेन्नईच्या मालकाचे नाव ऐकून थक्क व्हाल…
–आयपीएल इतिहासातील हे आहेत ५ मोठे वाद, ज्यामुळे आयपीएलच नाव झालं खराब
–आयपीएलच्या ट्राॅफीवर संस्कृत भाषेत नक्की काय लिहीले आहे?
–या दोन संघांनी आयपीएलमध्ये बदलले आहेत तब्बल ११ कर्णधार
–आयपीएलचे तब्बल ११ हंगाम एकाच संघाकडून खेळलेला तो एकमेव खेळाडू