सध्या जगभरातून एक बातमी समोर आले आहे. ज्यानुसार तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर अधिकार मिळवला आहे. त्यामुळे अफगाणिस्तानच्या क्रिकेटवर आणि खेळाडूंवर याचा परिणाम होऊ शकतो. अशी शंका आता वर्तवली जात आहे. दरम्यान, अफगाणिस्थान क्रिकेट बोर्डचे (एसीबी) कार्यकारी अधिकारी हमीद शिनवारीने या घटनेनंतर भाष्य केले.
ते म्हणाले, “अफगाणिस्तानवरील तालिबानच्या अधिकाराने इथल्या क्रिकेटला कोणत्याही प्रकारचा धोका नाही. कारण तालिबान स्वतः या खेळाला पसंत करतात. तसेच त्याचे समर्थन देखील करतात.”
काबुलमधून पीटीआय सोबत बोलताना शिनवारी म्हणाले, “तालिबानींसाठी क्रिकेट आवडीचा खेळ आहे. त्यांनी सुरुवातीपासूनच आमचे समर्थन केले आहे. ते आमच्या कामकाजामध्ये बिलकुल हस्तक्षेप करत नाहीत. तसेच मला त्यांच्याकडून समर्थनाची देखील आशा आहे. ज्यामुळे आमचे क्रिकेट आणखीन पुढे जाऊ शकते. आमचे अध्यक्ष सक्रिय आहेत आणि पुढची सूचना येईपर्यंत मीच कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार सांभाळणार आहे”
सध्या राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब जादरान यांसारखे खेळाडू इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ‘द हंड्रेड’ या स्पर्धेत खेळत आहे. या सर्व खेळाडूंचा परिवार अफगाणिस्तान मध्येच आहे. तसेच इतर खेळाडूंना व त्यांच्या परिवाराला कोणत्याही प्रकारचा धोका उद्भवणार नसल्याची ग्वाही देखील तालिबानने दिल्याचे शिनवारी सांगितले यांनी सांगितले.
अफगाणिस्तानमध्ये १९९६ ते २००१ च्या दरम्यान, तालिबानचे शासन होते. त्या काळातच अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटची सुरुवात झाली होती. शरणार्थी म्हणून पाकिस्तानमध्ये गेलेले अफगाणी लोक या खेळाशी जोडले गेले होते. यावर बोलताना शिनवारी पुढे म्हणाले, “असे म्हटले जाऊ शकते की, तालिबानच्या काळातच अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचा प्रसार झाला. तेव्हा आमचे अनेक खेळाडू पाकिस्तानच्या पेशावर येथे क्रिकेटशी संबंधित सराव करत होते. त्यांनीच अफगाणिस्तानमध्ये क्रिकेटचे पाय रोवले.”
“आनंदाची बाब ही आहे की, आता सर्व पूर्ववत होत आहे. आता इथली परिस्थिती सामान्य होत चालली आहे. लोक त्यांच्या त्यांच्या कामाला लागलेली आहेत. आम्हीसुद्धा आता कार्यालयात जाऊन काम करणार आहोत. ज्यानंतर श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्याविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या मालिकेपूर्वी राष्ट्रीय शिबिराचे आयोजन करणार आहोत,” असेही ते पुढे म्हणाले.
दरम्यान, अफगाणिस्तानचे खेळाडू राशिद खान, मोहम्मद नबी आणि मुजीब जादरान हे तिघेही इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) खेळतात. ते तिघेही आयपीएलचा संघ सनरायझर्स हैदराबादमध्ये आहेत. कोरोनामुळे स्थगित केलेल्या आयपीएल २०२१चे उर्वरित सामने यूएई मध्ये १९ सप्टेंबर पासून खेळवले जाणार आहेत. यातील पहिला सामना मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होणार असून दोन्ही संघ यूएईला रवाना देखील झालेले आहेत.
महत्वाच्या बातम्या –
–भारतप्रेम की वेडेपणा? लाईव्ह सामन्यात भारतीय खेळाडू असल्याचे सांगणाऱ्या व्यक्तीचे ‘हे’ ट्वीट व्हायरल
–पावसामुळे सामन्यात व्यत्यय येऊ नये म्हणून क्रिकेट ऑस्ट्रेलियाने २१ वर्षांपूर्वी लढवली होती ‘अशी’ भन्नाट शक्कल
–लॉर्ड्सवर मिळवलेल्या भारताच्या ऐतिहासिक विजयाची पाच महत्त्वाची कारणं, वाचा सविस्तर