अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारतीय संघाने वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना गमावला. विश्वचषक स्पर्धेत जबरदस्त फॉर्ममध्ये असणारा भारतीय संघ अंतिम सामन्यात मात्र, अपयशी ठरला. ऑस्ट्रेलियाने 6 विकेट्स राखून भारताला मात दिली. अनेकजण नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीला पराभवासाठी दोष देत आहेत. अशात राजकिय वर्तुळातून मोठे विधान समोर येत आहे.
ऑस्ट्रेलियन संघाला विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात 241 धावांचे लक्ष्य मिळाले होते. प्रथम फलंदाजी करताना भारताने 240 धावांवर सर्व विकेट्स गमावल्या होत्या. प्रत्युत्तरात 4 विकेट्सच्या नुकसानावर आणि 43 षटकांमध्ये ऑस्ट्रेलिया संघ जिंकला. भारतीय संघाकडे 20 वर्षांनंतर वनडे विश्वचषक जिंकण्याची संधी होती. पण गोलंदाजी आणि फलंदाजी विभागात संघ अपेक्षित प्रदर्शन करू शकला नाही आणि अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला.
भारतीय संघाच्या पराभवानंतर संपूर्ण देशाती एकप्रकारे निराशा झाली. उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्र आणि मसाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनीही या पराभवावर प्रतिक्रिया दिली. अखिलेश यांनी एका सभेत असे विधान केले की, “वनडे विश्वचषकाचा अंतिम सामना इथे (लखनऊमध्ये) झाला अशता, तर भारतीय संघाला विष्णू आणि अटल बिहारी वाजपेयी यांचा आशिर्वाद मिळाला असता. भारतीय संघ जिंकला असता. आता असे म्हटले जात आहे की, त्याठिकाणची (अहमदाबाद) खेळपट्टी गडबड होती.”
दरम्यान, अखिलेश यांचे हे विधान सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वनडे विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला अपयश मिळाले. पण हा सामना पाहण्यासाठी जगातील सर्वात मोठ्या स्टेडियममध्ये 1,30,000 क्रिकेटप्रेमी एकत्र जमले होते. मैदानात अक्षरशा निळा महासागर पाहायला मिळाला. पण ट्रेविस हेड आणि मार्नस लॅबुशेन यांच्या भागीदारीमुळे या चाहत्यांचा हिरमोड झाला. ऑस्ट्रेलियन संघाने इतिहासातील सहावा वनडे विश्वचषक नावावर केला. (Akhilesh Yadav explained the reason behind India’s defeat)
महत्वाच्या बातम्या –
Stop Clock Rule । आयसीसीचा नवीन नियम नक्की काय आहे? न खेळता मिळणार 5 धावा
“धोनी माझा आवडता बॅटिंग पार्टनर”, गंभीरच्या वक्तव्याने उंचावल्या सर्वांच्याच भुवया