---Advertisement---

विराटचा १०० व्या कसोटीत बीसीसीआय अध्यक्षांच्या विक्रमालाच धक्का, पाहा काय केलाय कारनामा

Virat Kohli
---Advertisement---

भारत आणि श्रीलंका (IND vs SL Test Series) यांच्यातील कसोटी मालिकेचा पहिला सामना शुक्रवारी (४ मार्च) मोहालीमध्ये सुरू झाला. हा पहिला सामना माजी कर्णधार आणि दिग्गज फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) याच्यासाठी महत्वाचा आहे. कारण विराटच्या कसोटी कारकिर्दीतील हा १०० वा कसोटी सामना असणार आहे. चाहते या सामन्यात विराटच्या ७१ व्या शतकाची प्रतिक्षा करत होते, पण पहिल्या डावात हे शक्य होऊ शकले नाही. असे असले तरी, विराटने भारतीय दिग्गज सौरव गांगुलांचा एका खास यादीत मागे टाकले आहेत.

सामन्याच्या पहिल्या डावात विराट चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला होता. त्याने ७६ चेंडूंचा सामना केला आणि ४५ धावा केल्या. यामध्ये त्याच्या ५ चौकारांचा समावेश होता. या पाच चौकारांच्या मदतीने त्याने कसोटी क्रिकेटमध्ये ९०० चौकार मारण्याचा टप्पा पार पाडला आहे. कसोटी चौकारांच्या बाबतीत माजी कर्णधार आणि सध्याचे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलींना विराटने मागे सोडले आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक चौकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये सचिन तेंडुलकर पहिल्या क्रमांकावर आहे. सचिनच्या नावावर एकूण २०५८ कसोटी चौकारांची नोंद आहे. त्यानंतर या यादीत राहुल द्रविडचा समावेश आहे, ज्यांनी १६५४ कसोटी चौकार ठोकले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर १२३३ चौकारांसह विरेंद्र सेहवाग आहे. चौथ्या क्रमांकावर ११३५ चौकारांसह व्हीव्हीएस लक्ष्मण आहे, सुनील गावसकर १०१६ चौकारांसह पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर विराट कोहली आता पाचव्या क्रमांकावर पोहोचला आहे, ज्याने ९०१ कसोटी चौकार पूर्ण केले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये ९०० चौकार मारलेले सौरव गांगुली सातव्या क्रमांकावर घसरले आहेत.

त्याव्यतिरिक्त विराटने अजून एक महत्वाचा विक्रम या सामन्यात नावावर केला आहे. विराट आता कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावा करणाऱ्या दिग्गज खेळाडूंमध्ये सहभागी झाला आहे. पहिल्या डावात केलेल्या ४५ धावांमुळे त्याने ८००० कसोटी धावांचा टप्पा ओलांडला आहे.

दरम्यान, सामन्याच्या पहिल्या दिवशी रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय गेतला. प्रथम फलंदाजी करताना मयंक अगरवाल (३३), रोहित शर्मा (२९), विराट कोहली (४५), श्रेयस अय्यर (२७) या महत्वाच्या खेळाडूंपैकी एकालाही अर्धशतकी खेळी करता आली नाही.  हनुमा विहारीने मात्र ५८ धावांचे योगदान दिले. तसेच रिषभ पंतने ९६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे पहिल्या दिवसाखेर भारताने ८५ षटकात ६ बाद ३५७ धावा केल्या.

महत्वाच्या बातम्या –

विराटच्या आधी १०० कसोटी खेळणारे ११ भारतीय दिग्गज माहित आहेत का? पाहा संपूर्ण यादी

मोठी बातमी! १०० व्या कसोटीतही विराट शतक करण्यात अपयशी, अवघ्या ‘इतक्या’ धावांवर क्लीन बोल्ड

कधी सुधारणार रोहित शर्मा! मोहाली कसोटीत छोटीशी चूक करत फक्त २९ धावांवर झाला बाद

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---