अनेक क्रिकेटपटू त्यांची कामगिरी सुधारण्यासाठी खूप मेहनत करत असतात. त्यासाठी ते वेगवेगळ्या गोष्टी करतानाही दिसत असतात. पण, भारतीय संघाचा फलंदाज श्रेयश अय्यरला त्याच्या कामगिरीसाठी चक्क मानसोपचार तज्ञाकडे जावे लागले होते. याविषयीची माहिती स्वत: त्याचे वडील संतोष अय्यर यांनी दिली आहे.
ते म्हणाले की, जेव्हा श्रेयस (Shreyas Iyer) खेळताना चांगले प्रदर्शन करू शकत नव्हता, तेव्हा त्याने मानसोपचार तज्ञाची (psychiatrist) मदत घेतली आणि त्यानंतर त्याच्या प्रदर्शनात चांगले बदल झाले.
संतोष अय्यर (Santosh Iyer) यांनी क्रिकबझच्या स्पाईसी पीच या कार्यक्रमात सांगितले की, “श्रेयस जेव्हा 16 वर्षाचा होता तेव्हा त्याची कामगिरी बिघडली होती. त्यावेळी मला वाटले की माझ्या रागवण्यापेक्षा त्याला मानसोपचार तज्ञाच्या सल्ल्याची जास्त आवश्यकता आहे. सामान्यत: भारतातील ज्या पालकांना आपल्या मुलांकडून जास्त अपेक्षा असतात, ते त्यांचे भले करण्याच्या नादात स्वत:चे नुकसान करून घेतात.”
मर्यादित षटकांच्या सामन्यात भारतीय संघातील आपले स्थान निश्चित करणाऱ्या श्रेयशच्या वडिलांनी सांगितले, “श्रेयस 4 वर्षांचा असताना घरी प्लास्टिकच्या चेंडूने क्रिकेट खेळत असायचा. त्यावेळीही तो चेंडूला बॅटच्या मधोमधून मारत होता. तेव्हाच आम्हाला त्याच्यातील क्रिकेटच्या प्रतिभेबद्दल समजले. म्हणून त्याच्यासाठी आम्हाला जे करणे शक्य होते ते आम्ही करण्याचा प्रयत्न केला.”
16 वर्षांखालील मुंबई संघाकडून खेळताना जेव्हा श्रेयसची कामगिरी खराब झाली होती. तेव्हा त्याच्या प्रशिक्षकांनी सांगितले होते की त्याचे लक्ष विचलित आहे. याविषयी बोलताना संतोष पुढे म्हणाले की, “जेव्हा त्याच्या प्रशिक्षकाने मला सांगितले की तुमच्या मुलात प्रतिभेची कमी नाही पण त्याचे लक्ष भरकटत आहे. हे ऐकून मी थोडा चिंतित झालो होतो. मला वाटले होते की तो कुणाच्या तरी प्रेमात पडला असेल किंवा त्याला वाईट संगत लागली असेल.”
ही 9 वर्षांपुर्वीची गोष्ट आहे जेव्हा मानसोपचार तज्ञांना जास्त महत्त्व दिले जात नव्हते. तेव्हा जास्त तर वडील त्यांच्या मुलांना रागवत होते. पण, मी श्रेयसला मानसोपचार तज्ञाकडे नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी त्या तज्ञांनी मला चिंता करण्याची गरज नाही असे सांगितले होते. इतर क्रिकेटपटूंप्रमाणे श्रेयसचाही वाईट काळ चालू होता. पण लवकरच त्याने लय मिळवली आणि मग तो मागे वळला नाही.
श्रेयसने 18 वनडे सामन्यात जवळपास 50च्या सरासरीने 748 धावा केल्या आहेत. तर, 22 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात त्याने 27 पेक्षा जास्त सरासरीने 417 धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-धोनी विमानप्रवास करताना खेळाडूंबरोबर बसत नाही तर…
-अशी कामगिरी करणारा धोनी पृथ्वीवरील एकमेव खेळाडू
-३ फलंदाज जे घेऊ शकतात विराटची आयसीसी वनडेत क्रमावारीतील अव्वल जागा