भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात चार कसोटी सामन्यांची बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने पार पडले आहेत. यापैकी प्रत्येकी एक सामना दोन्ही संघाने जिंकला आहे. त्यामुळे मालिका सध्या बरोबरीत आहे. दोन्ही सामन्यात दोन्ही संघ मोठी धावसंख्या उभारण्यात अपयशी ठरले आहेत. याचा अंदाज या गोष्टीवरून लावला जाऊ शकतो की मागील 132 वर्षात ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यात प्रति विकेट धावांची सरासरी सर्वात कमी राहिली आहे.
पहिल्या कसोटी सामन्यातील भारतीय संघाचा दुसरा डाव फक्त 36 धावसंख्येवर संपूष्टात आला होता. ज्यामुळे भारतीय संघाला ऍडलेडमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभूत व्हावे लागले होते. या ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यात प्रती विकेट धावांची सरासरी खूप कमी राहिली आहे.
या हंगामात प्रती विकेट धावांची सरासरी 21.50 राहिलेली दिसून आली आहे. या अगोदर 132 वर्षापूर्वी साल 1887-88 मध्ये ऑस्ट्रेलियन उन्हाळ्यात प्रती विकेट धावांची सरासरी कमी राहिली होती. त्यावेळी उन्हाळ्यात प्रती विकेट धावांची सरासरी केवळ 9.35 होती. त्याचबरोबर आता प्रती विकेट धावांची सरासरी 21.50 इतकी आहे. मागील उन्हाळ्यात जेव्हा पाकिस्तान आणि न्यूझीलंड संघाने ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता, तेव्हा प्रती विकेट धावांची सरासरी 34.01 इतकी होती.
भारताने दोन वर्षापूर्वी ऑस्ट्रेलिया दौरा केला होता, तेव्हा प्रति विकेट धावांची सरासरी 30.03 एवढी होती. त्यामुळे क्रिकेट डॉट कॉम डॉट एयूच्या अहवालानुसार रनरेट मध्येही प्रचंड घसरण झाली आहे. या शतकातील कोणत्याही उन्हाळ्यातील हा सर्वात कमी रनरेट 2.63 राहिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी 7 जानेवारी पासून खेळला जाणार आहे. हा सामना सिडनीतील क्रिकेट मैदानावर खेळला जाईल. या सामन्यासाठी भारतीय संघाचा प्रमुख फलंदाज रोहित शर्मा उपलब्ध असणार आहे
ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 195 धावसंख्या होती. त्या प्रत्युत्तरादाखल भारतीय संघाने पहिल्या डावात सर्वबाद 326 धावा केल्या. त्यांनतर ऑस्ट्रेलिया संघाने दुसर्या डावात सर्वबाद 200 धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी 70 धावांचे लक्ष्य दिले होते. ते भारतीय संघाने आपल्या दुसर्या डावात 2 गडी गमावून पूर्ण केले. त्याचबरोबर या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला.