ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीने यापूर्वी भारतीय संघाला टी२० विश्वचषकाचे जेतेपद मिळवण्यासाठी प्रबळ दावेदार सांगितले होते. मात्र, आता ब्रेट लीने त्याच्या विधानावरून माघार घेतली आहे. त्याने आता पाकिस्तान आणि इंग्लंड संघ जेतेपदासाचे प्रबळ दावेदार असल्याचे सांगितेले आहे. तसेच ऑस्ट्रेलिया संघ इंग्लंडविरुद्ध मिळालेला पराभव विसरून स्पर्धेत पुनरागमन करेल, असाही त्याला विश्वास आहे.
ऑस्ट्रेलियाला विश्वचषकात मागच्या आठवड्यात इंग्लंडकडून मोठा पराभव मिळाला होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत २० षटकात सर्व विकेट्स गमावल्या आणि १२५ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात इंग्लडने हे लक्ष्य अवघ्या ११.४ षटकात आणि दोन विकेट्सच्या नुकसानावर गाठले होते.
ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकातील त्याच्या पहिल्या तीन सामन्यांमध्ये दोन विजय मिळवले आहेत आणि संघ चार गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. उपांत्य सामन्यात पोहोचण्यासाठी ऑस्ट्रेलियाला त्याचे उर्वरित सामने जिंकावे लागतील, कारण दक्षिण अफ्रिकाने चार पैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावार आहे. तसेच दक्षिण अफ्रिकेचा नेट रन रेटही चांगला आहे.
ब्रेट लीने आयसीसीसाठी लिहिलेल्या त्याच्या कॉलममध्ये या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्याने लिहिले की, “इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध अफलातून प्रदर्शन केले. एकदिवसीयमधील विश्वविजेत्या संघाने अप्रतिम खेळ दाखवला. ऑस्ट्रेलियानेही काही भागांमध्ये चांगेल प्रदर्शन केले, पण सामन्यात इतर भागातील सुमार प्रदर्शनामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियासाठी निराश होणारी स्थिती आहे. मी गोष्टींना सकारात्मक दृष्टीकोनातून पाहण्याचा प्रयत्न करतो. खूप सारे लोक म्हणत आहेत की, त्याने संघात नसले पाहिजे, त्याने फलंदाजी नाही केली पाहिजे आणि अशाच अनेक गोष्टी”
ब्रेट लीने या कॉलममध्ये हिंदीचा उपयोग करून त्याचे म्हणणे समजवण्याचा प्रयत्न केला आहे. तो म्हटला आहे की, “हिंदीमध्ये म्हटले जाते की, आराम से, आराम से. याचा अर्थ आहे सहज होऊन, धैर्यपूर्वक पुढे जायचे. मला वाटते की, ही प्रत्यक्षात एक चांगली अभिव्यक्ती आहे, ज्याचा उपयोग संघ सहज होऊन त्यांच्या कामावर लक्ष देण्यासाठी करू शकतो. सर्व काही ठीक होईल.”
ब्रेट लीच्या मते ऑस्ट्रेलियाचे वरच्या फळीतील फलंदाजांना चांगले प्रदर्शन करावे लागेल. “वरच्या फळीतील फलंदाजांना चांगले प्रदर्शन करावे लागेल. स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस यांच्यासारख्या खेळाडूंना धावा कराव्या लागतील. ते पहिल्या दोन सामन्यात चांगल्या फॉर्ममध्ये होते, पण इंग्लंडविरुद्ध चूकले आणि हा खेळाचा भाग आहे,” असे ब्रेट लीने पुढे म्हटले आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
टी२० विश्वचषकात भारताला सुरुवातीलाच अपयश आल्याने विनोद कांबळीची धोनीच्या मार्गदर्शक पदावर टीका
स्कॉटलंडविरुद्ध न्यूझीलंडचा १६ धावांनी महत्त्वपूर्ण विजय, मार्टिन गप्टिलची तुफानी खेळी
स्कॉटलंडच्या यष्टीरक्षकाची गंमतीदार कोपरखळी; गोलंदाजाला म्हणाला, ‘संपूर्ण भारत तुझ्या पाठीशी’