रविवारी (२५ ऑक्टोबर) रविवारी(२६ ऑक्टोबर) आयपीएल २०२० मध्ये ४५ वा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. हा सामना राजस्थानने ८ विकेट्सने जिंकला. असे असले तरी याचे सर्वाधिक नुकसान ३ वेळच्या आयपीएल विजेत्या चेन्नई सुपर किंग्स संघाला बसला आहे. चेन्नई संघ गणिती समीकरणांनुसार यंदाच्या आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.
त्यामुळे आता या संघाचे जरी आयपीएलमधील आव्हान संपुष्टात आले असले तरी त्यांचे साखळी फेरीतील २ सामने बाकी आहेत. त्यातील एक सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध आणि एक सामना किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध होणार आहेत. या दोन्ही सामने चेन्नईसाठी स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महत्त्वाचे नसले तरी त्यांचा गुणतालिकेत शेवटचे स्थान टाळण्याचा प्रयत्न ते या दोन सामन्यात करु शकतात.
मात्र हे सामने कोलकाता आणि पंजाबसाठी महत्त्वाचे आहेत. कारण ते हा सामना पराभूत झाले तर प्लेऑफमध्ये जाण्याचे मार्ग त्यांच्यासाठी आणखी कठीण होतील. कारण दोन्ही संघांना प्लेऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी त्यांच्या उर्वरित ३ सामन्यांमध्ये विजय गरजेचा आहे.
त्यातच चेन्नईकडे गमावण्यासारखे काही नसल्याने त्यांच्यावर कोलकाता आणि पंजाब विरुद्धच्या सामन्यांमध्ये कोणताही दबाव असणार नाही. त्यामुळे ते खुलेपणाने त्यांचा खेळ करतील. त्यामुळे कोलकाता आणि पंजाबसाठी चेन्नईचे तगडे आव्हान असण्याचीच शक्यता दाट आहे.
त्यामुळे आता दबाव झुगारुन कोलकाता आणि पंजाब चेन्नईला पराभूत करणार का आणि स्पर्धेत टिकून राहाणार का की कोणताही दबाव नसलेला चेन्नई संघ कोलकाता आणि पंजाबला भारी पडणार हे पाहावे लागेल.
महत्त्वाच्या बातम्या-
‘दसऱ्याच्या मेळ्यातून केली जोरदार शॉपिंग,’ सॅम करनच्या नव्या लूकवर जबरदस्त मिम्स व्हायरल
हार्दिक पंड्याने केलाय नवा विक्रम, ‘सिक्सर किंग’ युवराजलाही टाकले मागे
‘२०२१ वर्ष आपलंच असेल!’, चेन्नईचे आव्हान संपल्याने ट्विटरवर आल्या भावनिक प्रतिक्रिया
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी
अतिशय गरीबीतुन पुढे आलेले ५ भारतीय क्रिकेटपटू, आज आहेत करोडपती