आयपीएलचा सर्वात यशस्वी संघ म्हटलं की, सर्वांच्या तोंडात पहिल्यांदा ‘मुंबई इंडियन्स’ हे नाव येतं. याच मुंबई संघाला कित्येक सामन्यात एकहाती विजय मिळवून देणारा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात प्रशंसनीय फलंदाजी केली. रविवारी (२५ ऑक्टोबर) अबु धाबीच्या शेख झायेद स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर पंड्याने मोठा खुलासा केला आहे.
तो म्हणाला की, “मी राजस्थानविरुद्धच्या जबरदस्त खेळीचा खूप आनंद लुटला. मी खूप दिवसांपासून अशा धमाकेदार खेळीची वाट पाहत होतो, ज्यामध्ये मी मोठ-मोठे षटकार लगावेल. पण यंदा माझी फलंदाजी जास्त कमाल दाखवत नव्हती. मात्र आयपीएलची सुरुवात होण्याआधी मी केलेली मेहनत आता फळाला आली आहे.”
तसेच पुढे बोलताना पंड्या म्हणाला की, “मी माझ्या बॅटने खालून काही शॉट मारले. यावेळी मी माझी सर्वात आवडती बॅट वापरली होती. महत्त्वाचे म्हणजे, या बॅटने मी गेल्या ३ वर्षांपासून खेळत आहे. मला माझ्या गोष्टी सांभाळून ठेवायला खूप आवडतात.”
पंड्याने राजस्थानविरुद्धच्या सामन्यात सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने ६व्या क्रमांकावर फलंदाजीला येत २१ चेंडूत नाबाद ६० धावा ठोकल्या होत्या. यात त्याच्या २ चौकारांचा आणि ७ षटकारांचा समावेश होता. मात्र राजस्थानचा धुरंधर बेन स्टोक्सने शतकी खेळी करत मुंबईचा विजयरथ रोखला आणि ८ विकेट्सने सामना जिंकला.
महत्त्वाच्या बातम्या-
हार्दिक पंड्याने केलाय नवा विक्रम, ‘सिक्सर किंग’ युवराजलाही टाकले मागे
हिरवी जर्सी बेंगलोरसाठी अनलकी ? पहा काय सांगतात आकडे
“शेवटच्या वेदनादायक १२ तासांचा आनंद घ्या”, असे का म्हणाला एमएस धोनी, घ्या जाणून
ट्रेंडिंग लेख-
IPL 2020: ‘या’ ३ संघांचा प्लेऑफमध्ये प्रवेश जवळपास निश्चित, तर एका स्थानासाठी झगडणार ४ संघ
कोण होत्या ‘त्या’ ६ मिस्ट्री गर्ल, ज्यांना आयपीएलदरम्यान काही तासातच मिळाली प्रसिद्धी