---Advertisement---

धोनी-कोहलीमधील ती खास शर्यत नक्की जिंकणार कोण?

---Advertisement---

बंगळूरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा टी20 सामना होणार आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियम, बेंगलोर येथे भारतीय प्रमाणवेळे नुसार संध्याकाळी 7 वाजता सुरु होणार आहे.

या सामन्यात भारताचे आजी-माजी कर्णधार विराट कोहली आणि एमएस धोनीला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 50 षटकारांचा टप्पा पार करण्याची संधी आहे. यासाठी धोनीला एका षटकाराची तर विराटला दोन षटकारांची गरज आहे.

धोनीने आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 97 सामन्यात 49 षटकार मारले आहेत, तर विराटने 66 सामन्यात 48 षटकार मारले आहेत. त्यामुळे आता या दोघांपैकी कोण पहिल्यांदा 50 षटकारांचा टप्पा पार करणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय 20 मध्ये आत्तापर्यंत 29 फलंदाजांनी 50 षटकार मारण्याचा विक्रम पार केला आहे. त्यात रोहित शर्मा, युवराज सिंग आणि सुरेश रैना या तीन भारतीय फलंदाजांचा समावेश आहे.

भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे क्रिकेटपटू-

102 – रोहित शर्मा

74 – युवराज सिंग

58 – सुरेश रैना

49 – एमएस धोनी

48 – विराट कोहली

महत्त्वाच्या बातम्या-

भारताविरुद्धच्या दुसऱ्या टी२०आधी ऑस्ट्रेलिया संघाला बसला मोठा धक्का

आज होणाऱ्या दुसऱ्या टी२० सामन्यात या खास विक्रमांवर असेल नजर

इतिहास घडविण्यापासून जसप्रीत बुमराह केवळ २ विकेट दूर

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment