बंगळूरु। भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात आज(27 फेब्रुवारी) दुसरा टी20 सामना बंगळूरुच्या एम चिन्नास्वामी स्टेडीयमवर पार पडणार आहे. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे.
हा सामना भारतासाठी करो या मरोचा सामना असेल. कारण दोन सामन्यांच्या या टी20 मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताला पराभव स्विकारावा लागला आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलिया या मालिकेत 1-0 अशा फरकाने अघाडी आहे.
तसेच आज होणाऱ्या या सामन्यात भारतीय खेळाडूंना काही खास विक्रम करण्याची संधी आहे.
आजच्या टी20 सामन्यात होऊ शकतात हे विक्रम-
-शिखर धवनला आज अंतिम 11 जणांच्या संघात संधी मिळाली तर हा सामना त्याचा 50 वा आंतरराष्ट्रीय टी20 सामना असणार आहे. आत्तापर्यंत 50 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळण्याचा टप्पा एमएस धोनी, रोहित शर्मा, सुरेश रैना, विराट कोहली आणि युवराज सिंग या पाच भारतीय खेळाडूंनी पार केला आहे.
-रोहित शर्माला आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारणारा क्रिकेटपटू होण्यासाठी 2 षटकारांची गरज आहे. त्याचे सध्या आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 102 षटकार आहेत. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम ख्रिस गेल आणि मार्टीन गप्टील यांच्या नावावर आहे. या दोघांनीही प्रत्येकी 103 षटकार मारले आहेत.
-जसप्रीत बुमराहला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स मिळवणारा भारतीय गोलंदाज होण्यासाठी दोन विकेट्सची गरज आहे. तो सध्या या यादीत 51 विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर अव्वल क्रमांकावर 52 विकेट्ससह आर अश्विन आहे.
-विराटने जर या सामन्यात 23 धावा केल्या तर तो भारताकडून कर्णधार म्हणून टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसऱ्या क्रमांकावर येईल. याबरोबरच तो रोहितला मागे टाकेल.
सध्या रोहितने भारताचे 15 टी20 सामन्यात नेतृत्व करताना 39.71 च्या सरासरीने 556 धावा केल्या आहेत. यात त्याच्या 2 शतकांचा आणि 3 अर्धशतकांचा समावेश आहे. तर विराटने कर्णधार म्हणून 21 टी20 सामन्यात 33.37 च्या सरासरीने 3 अर्धशतकांच्या सहाय्याने 534 धावा केल्या आहेत.
–विराटने जर या सामन्यात 82 धावा केल्या तर विराट आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल. तसेच मार्टीन गप्टिल आणि शोएब मलिक यांना मागे टाकेल.
विराटने 66 टी20 सामन्यात 48.68 च्या सरासरीने 2191 धावा केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत न्यूझीलंडचा मार्टिन गप्टील 2272 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. तर 2263 धावांसह शोएब मलिक तिसऱ्या स्थानावर आहे. तसेच भारताचा रोहित शर्मा 2331 धावांसह अव्वल स्थानी आहे.
– एमएस धोनी आणि विराट कोहलीला आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 षटकार पूर्ण करण्याची संघी आहे. यासाठी धोनीला एका आणि विराटला दोन षटकारांची गरज आहे. भारताकडून आत्तापर्यंत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये रोहित शर्मा, सुरेश रैना आणि युवराज सिंग यांनीच 50 षटकारांचा टप्पा पार केला आहे.
– रोहितला जर आज 11 जणांच्या संघात स्थान मिळाले तर त्याचा हा एकूण कारकिर्दीतील 300 वा ट्वेंटी20 क्रिकेट सामना असणार आहे. याआधी हा टप्पा एमएस धोनी आणि सुरेश रैना या भारतीय खेळाडूंनीच पार केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
–इतिहास घडविण्यापासून जसप्रीत बुमराह केवळ २ विकेट दूर
–दोन बदलांसह अशी असु शकते दुसऱ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडिया