माजी अनुभवी फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने एक विधान केले आहे. त्याने म्हटले आहे की दुसर्या वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध 24 धावांनी झालेल्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या मनोबलाला मोठा फटका बसेल.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करणार्या इंग्लंडचा संघ 9 बाद 231 धावा करू शकला. ज्याला उत्तर देताना ऑस्ट्रेलियाचा संघ अवघ्या 207 धावा करू शकला.
ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 3 बाद 144 अशी असताना असे दिसत होते की संघ सहज सामना जिंकू शकेल. परंतु त्यानंतर त्यांची फलंदाजी पत्त्यांसारखी कोसळली.
वॉर्नने टी20 आंतरराष्ट्रीय मालिकेच्या पहिल्या सामन्यातील कामगिरीची आठवण करुन दिली. तो म्हणाला, “त्या सामन्यापूर्वी ऑस्ट्रेलिया संघ बरेच दिवस क्रिकेट खेळला नव्हता. त्यामुळे आपण त्यांची स्थिती समजू शकतो.”
पुढे बोलतांना तो म्हणाला, “बरेच दिवस क्रिकेट न खेळल्यामुळेच त्यांनी मालिका गमावली. त्या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघ मजबूत स्थितीत होता. त्यांनी 2 बाद 124 धावा केल्या. त्यानंतर त्यांना फक्त 6 बाद 148 धावा करता आल्या आणि दोन धावांनी हा सामना गमावला.”
संघाच्या स्थितीबद्दल बोलतांना तो म्हणाला “त्यानंतर संघ चांगली कामगिरी करत होता. पण या वनडे सामन्यामुळे त्यांचे ध्यैर्य खालावेल. अशा स्थितीतून सामना जिंकण्याची त्यांना सवय होती. या गोष्टीचा त्यांना अभिमानही होता. हा संघ सहसा असे करत नाही. त्यांनी चांगली कामगिरी केली नाही, फक्त अॅरॉन फिंच लयमध्ये दिसत होता. आता मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे.”
इंग्लंडची एकेवेळी 8 बाद 149 धावांची कठीण परिस्थिती होती. परंतु टॉम करन (37) आणि आदिल रशीद (नाबाद 35) यांनी 76 धावांची भागीदारी करून संघाला अधिक चांगल्या स्थितीत आणले.
वॉर्नने गोलंदाजांना लक्ष्य करताना म्हटले, “ते थोडेसे चुकले. बळी घेण्याच्या प्रयत्नात ते लोभी झाले होते.”
या मालिकेचा तिसरा आणि निर्णायक सामना बुधवारी रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-अर्जुन तेंडूलकरचे फोटो होतायत व्हायरल, थेट मुंबई इंडियन्सच्या…
-थेट ख्रिस गेलला बाहेरचा रस्ता दाखवून दिग्गजाने असा तयार केला पंजाबचा संघ
-अनुष्काने शेअर केलेल्या फोटोवर पती विराटने केली हृदयस्पर्शी कमेंट
ट्रेंडिंग लेख-
-४ असे माजी कर्णधार, जे यावेळी होऊ शकतात संघासाठी वॉटरबॉय
-एक आयपीएल फॅन म्हणून हे ५ संस्मरणीय क्षण विसरणे केवळ अशक्य…!!!
-मुंबई इंडियन्सला ५व्यांदा विजयी करण्यासाठी हे तीघे खेळाडू करणार जीवाचं रान