गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) २०२२च्या अंतिम फेरीत आहेत. गुजरातला पहिल्यांदाच आघाडीवर टक्कर द्यायची असेल, तर राजस्थानचा संघ तब्बल १४ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील गुजरातने १४ पैकी १० सामने जिंकले. त्याचवेळी संजू सॅमसनच्या खात्यात ९ विजय जमा झाले. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली २००८मध्ये राजस्थानचा संघ चॅम्पियन बनला होता. त्यानंतर या संघाची प्लेऑफच्या पुढे कधीच प्रगती झालेली नाही. यंदाच्या वर्षी मात्र राजस्थानने पूर्ण जोशात मैदानात उतरावे आणि गुजरातवर मात करावी असा सल्ला पाकिस्तानचा पूर्व गोलंदाज शोएब अख्तर यांने दिले आहे.
पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) राजस्थान रॉयल्सला सांगितले आहे की, “त्यांनी अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सविरुद्ध पूर्ण ताकदीने उतरावे, आणि हा सामना माजी कर्णधार शेन वॉर्नसाठी जिंकावा. राजस्थानचा संघ १४ वर्षांनंतर अंतिम फेरीत पोहोचला आहे. शेन वॉर्नच्या (Shane Warne) स्मरणार्थ राजस्थानने मैदानात उतरून गुजरातला हरवायचे आहे.“
“शेन वॉर्नसाठी राजस्थान जिंकलं पाहिजे, असं मनाला वाटत आहे. १४ वर्षात फायनलमध्ये पोहोचताना त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे, पण मी आधी म्हटल्याप्रमाणे, मला नेहमीच वाटत आहे गुजरात जिंकायला पाहिजे. कारण, ते चांगले खेळले आहेत. त्यामुळे माझी पहिली पसंती शेवटपर्यंत गुजरात टायटन्स हाच राहील,” असेही अख्तरने सांगितले आहे.
दरम्यान, यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरातने राजस्थानचा दोन सामन्यांत पराभव केला आहे. साखळी फेरीत गुजरातने राजस्थानचा ३७ धावांनी पराभव केला. यानंतर पहिल्या क्वालिफायरमध्येही गुजरातचे पारडे जड होते. पहिल्या क्वालिफायरमध्येही गुजरातने राजस्थानवर मात केली आहे. त्यामुळे सध्याच्या परिस्थितीत राजस्थान विरुद्ध गुजरातच्या संघाचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
व्हॉट्सअपवर अपडेट मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
आयपीएल २०२२च्या थरारक अंतिम सामन्यात ‘हा’ अभिनेता करणार कॉमेंट्री, क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला
राजस्थानच्या ‘या’ जोडीवर मात करू शकले नाही, तर गुजरातसाठी ट्रॉफी जिंकणे कठीण
‘दडपणाखाली होतो, पण त्याच्या प्रेरणादायी शब्दांनी मदत केली’, बटलरने ‘या’ दिग्गजाला दिले यशाचे श्रेय