जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2023चा अंतिम सामना अवघ्या 3 दिवसांवर आला आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात इंग्लंडच्या के ओव्हल मैदानात 7 ते 11 जूनदरम्यान हा सामना पार पडणार आहे. या सामन्यापूर्वीच आता भारतीय संघाचे माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद यांनी रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांच्याविषयी मोठे भाष्य केले आहे. ते म्हणालेत की, 2021च्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यामध्ये जडेजा आणि अश्विन या दोन फिरकीपटूंना खेळवण्याचा भारताचा डाव फसला होता. तरीही 2023मधील डब्ल्यूटीसी अंतिम सामना या दोन फिरकीपटूंसोबत खेळण्याची शक्यता दुर्लक्षित केली जाऊ शकत नाही.
दोन फिरकीपटू किंवा चार वेगवान गोलंदाजांवर प्रसाद यांचे वक्तव्य
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India vs Australia) संघात 7 जूनपासून डब्ल्यूटीसी अंतिम सामना (WTC Final) खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय प्लेइंग इलेव्हनमध्ये रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) आणि आर अश्विन (R Ashwin) या दोन फिरकीपटूंना खेळवले पाहिजे की नाही? हे मोठे कोडे आहे, ज्यासाठी सर्व क्रिकेट तज्ज्ञ आपापली मते मांडत आहेत. अशातच भारताचे माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद (MSK Prasad) यांनी माध्यमांशी संवाद साधला.
ते म्हणाले की, “जडेजा मागील काही काळापासून चांगली कामगिरी करत आहे, त्यामुळे तो एक तज्ज्ञ फलंदाजाच्या रूपात खेळू शकतो. दोघांची (जडेजा-अश्विन) क्षमता पाहता, त्यांना दुर्लक्षित करणे कठीण आहे आणि याचा निर्णय घेणे कठीण ठरेल. 400पेक्षा जास्त विकेट्स घेणारा अश्विन कोणत्याही खेळपट्टीवर गोलंदाजी करू शकतो. अशात हा खूपच कठीण निर्णय असेल.”
याव्यतिरिक्त प्रसाद यांनी डब्ल्यूटीसी अंतिम सामन्याविषयी बोलताना म्हटले की, “आम्ही दोन फिरकीपटू आणि तीन वेगवान गोलंदाजांच्या योजनेसह गेलो होतो, पण नंतर पाऊस आला आणि आम्ही योजना बदलली पाहिजे होती, पण आम्ही त्याच प्लेइंग इलेव्हनवर अडून राहिलो. मात्र, तो गोष्ट जुनी आहे. हे सर्व ओव्हलच्या स्थितीवर अवलंबून असेल. खेळपट्टी आणि स्थितीच या सिनेमाची खरी कहाणी आहे. आम्हाला माहिती नाही की, ते पाच दिवस कसे असतील, त्यामुळे आम्ही आपण आधीच ठरवले नाही पाहिजे. परिस्थिती समजून तुमच्या मनाला काय वाटते, ते केले पाहिजे.”
जागतिक कसोटी अजिंक्यपद 2021 स्पर्धेच्या अंतिम सामना भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात इंग्लंडच्या साऊथम्पटन येथे झाला होता. या सामन्यात अश्विन-जडेजाने मिळून फक्त 5 विकेट्स घेत्लया होत्या, तर इतर सर्व विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या होत्या. तसेच, न्यूझीलंडने एकही फिरकीपटू खेळवला नव्हता. सर्व 20 विकेट्स या वेगवान गोलंदाजांनी मिळून घेतल्या होत्या. (former selector msk prasad gave his opinion whether jadeja ashwin should play in the wtc final or not)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विराटला नडणाऱ्या नवीनचा इंग्लंडमध्ये राडा! 312च्या स्ट्राईक रेटने ‘सूर्या’ स्टाईलमध्ये ठोकल्या धावा, Video
‘सर्वजण सचिनबद्दल बोलतात, पण आशियात तोच सर्वोत्तम…’, सेहवागने गायले पाकिस्तानी खेळाडूचे गोडवे