आतापर्यंतच्या आयपीएल इतिहासावर नजर टाकली असता मुंबई इंडियन्स संघाला या स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघ म्हणता येईल. या संघाने आतापर्यंत पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. त्यांनी 2013 मध्ये प्रथम विजेतेपद जिंकले. त्यानंतर 2015, 2017, 2019 आणि 2020 मध्ये पुन्हा जेतेपदावर विराजमान झाले.
रोहित शर्मा कर्णधार झाल्यानंतर या संघाने सतत यश संपादन केले आहे. या संघाचे प्रशिक्षक कर्मचारीही उत्कृष्ट आहेत. यामध्ये सचिन तेंडुलकर, माहेला जयवर्धने, झहीर खान यासारख्या दिग्गजांचा समावेश आहे, जे सतत युवकांचे मार्गदर्शन करतात आणि त्यांना चांगले खेळाडू बनवण्यासाठी मदत करतात.
या संघातून खेळणार्या बर्याच खेळाडूंनी भारतीय संघातही जोरदार कामगिरी केली आहे. त्यामध्ये जसप्रीत बुमराह, पंड्या ब्रदर्स, ईशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे खेळाडू या संघाकडून खेळले आणि भारतीय संघात पोहोचले. या संघामधून खेळताना आपली कामगिरी कशी आहे, हे स्पष्टपणे दर्शवले. तथापि, असे काही खेळाडू आहेत ज्यांची मुंबईकडून कामगिरी चांगली राहिली नव्हती. परंतु त्यांनी इतर संघांसाठी चांगली कामगिरी बजावली आहे.
मुंबई इंडियन्समधून बाहेर पडल्यानंतर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करणारे चार खेळाडू
1. श्रेयस गोपाळ
कर्नाटककडून घरगुती क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्यावर लेग स्पिनर श्रेयस गोपाळला 2014 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याच्या संघात स्थान दिले. संघाबरोबर 4 हंगाम असूनही, त्याला जास्त संधी मिळाल्या नाहीत आणि केवळ 6 सामन्यांत खेळण्याची संधी मिळाली, त्यात श्रेयसने 7 विकेट्स घेतल्या. 2017 मध्ये, मुंबईने त्याला सोडले आणि जानेवारी 2018 मधील लिलावात राजस्थानने ह्या गोलंदाजाला विकत घेतले. तेव्हापासून तो या संघाचा मुख्य फिरकीपटू बनला आहे. राजस्थानकडून गोपालने आतापर्यंत 39 सामन्यांत 41 बळी मिळवले आहेत आणि एक हॅट्रिक आपल्या नावावर केली आहे.
2. शिखर धवन
भारतीय सलामीवीर फलंदाज शिखर धवनने आयपीएल कारकीर्दीची सुरुवात दिल्ली डेअरडेविल्सपासून केली होती. तथापि, दिल्लीसाठी एक हंगाम खेळल्यानंतर मुंबई इंडियन्सने धवनला विकत घेतले होते. धवनने 2009 आणि 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना 15 सामन्यात अवघ्या 231 धावा केल्या. या खराब कामगिरीमुळे धवनला 2011 च्या लिलावापूर्वी सोडण्यात आले आणि त्यानंतर डेक्कन चार्जर्सनी त्याला विकत घेतले.
धवनने या संघासाठी बरेच हंगाम खेळले आणि नंतर संघाचे नाव बदलल्यानंतर त्याला कर्णधारपदही देण्यात आले. 2016 च्या सनरायझर्स हैदराबादने जिंकलेल्या विजेतेपदामध्ये धवनचीही महत्त्वपूर्ण भूमिका होती. त्यानंतर तो 2019 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघात सामील झाला आणि त्याने गेल्या मोसमात संघासाठी सर्वाधिक धावा केल्या होत्या.
3. अंबाती रायडू
अंबाती रायुडूने 2010 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली होती. या फलंदाजाने मुंबई इंडियन्सकडून 8 हंगाम खेळले आणि जेतेपद जिंकण्यासाठी संघाला महत्त्वपूर्ण योगदान दिले. रायडूने 114 सामन्यात मुंबईकडून 27.15 च्या सरासरीने 2416 धावा केल्या. तथापि, आयपीएल 2018 च्या लिलावामध्ये मुंबईने त्याला सोडले आणि त्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने त्याला आपल्या संघात समाविष्ट केले. रायडूने चेन्नईकडून चमकदार असे पदार्पण केले आणि विजेतेपदात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्या मोसमात त्याने 602 धावा केल्या. यानंतर रायुडूने पुढील हंगामात 282 आणि 2020 मध्ये 359 धावा केल्या. या हंगामातही तो चेन्नई संघाचा भाग आहे.
4. ड्वेन ब्राव्हो
टी-20 क्रिकेटच्या दृष्टीने दिग्गज खेळाडूंमध्ये वेस्ट इंडिजच्या ड्वेन ब्राव्होचा समावेश आहे. अष्टपैलू खेळाडूने 2008 मध्ये मुंबई इंडियन्सकडून आयपीएल कारकीर्दीची सुरुवात केली आणि 2010 पर्यंत तो या संघाचा भाग होता. ब्राव्हो मुंबईबरोबर चांगली कामगिरी करू शकला, परंतु त्याच्या कारकिर्दीतील चमकदार कामगिरी त्याने चेन्नई सुपर किंग्जकडून खेळत असताना केली. 2011 च्या आयपीएलमध्ये ब्राव्हो चेन्नईत सामील झाला होता आणि तेव्हापासून तो या संघातील एक मॅच विनर खेळाडू ठरला आहे. या अष्टपैलू खेळाडूने चेन्नईकडून 95 सामन्यांत 135.36 च्या सरासरीने 994 धावा केल्या आहेत.तसेच त्याने 8.39 च्या इकॉनॉमी रेटने गोलंदाजीत 110 बळीही घेतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
‘त्याच्या’मुळेच विराटला टी२०त करता आली ओपनिंग; झहीर खानची युवा खेळाडूवर कौतुकाची थाप
वयाच्या २०व्या वर्षी राधा यादवचा ‘विश्वविक्रम’; केला कुणालाही न जमलेला किर्तीमान
दिग्गज शेवटी दिग्गजचं असतो! रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिजमध्ये सेहवागचे वादळ, प्रदर्शनावर टाका एक नजर