सौरव गांगुली, एमएस धोनी आणि विराट कोहली यांची गणना भारताच्या यशस्वी कर्णधारांमध्ये केली जाते. भारतीय क्रिकेटला एक वेगळी ओळख निर्माण करण्यात या तिन्ही खेळाडूंचे मोलाचे योगदान आहे.
तसं पाहिलं तर गांगुली, धोनी आणि विराटमध्ये अनेक साम्य आहेत. त्यांनी केलेल्या १८३ धावांचा एक वेगळाच योगायोग आहे. गांगुली (Sourav Ganguly), धोनी (Ms Dhoni) आणि विराटचा (Virat Kohli) फलंदाजी क्रम वेगळा वेगळा राहिला आहे. तरीही विशेष म्हणजे, आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये या तिन्ही खेळाडूंनी एका डावात वैयक्तिक सर्वोत्तम अर्थातच १८३ धावा केल्या आहेत.
या तिन्ही खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय वनडे क्रिकेटमध्ये (International ODI Cricket) द्विशतक झळकावण्याची संधी गमावली आहे. यामध्ये गांगुली सलामीला आणि मधल्या फळीत फलंदाजी करत होता आणि धोनीने वेगवेगळ्या क्रमांकावर फलंदाजी केली आहे. तर विराट हा तसा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करतो. परंतु त्याने वेगवेगळ्या क्रमांकावरही फलंदाजी करतो.
विशेष म्हणजे या तिन्ही खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावले आहेत.
सौरव गांगुली-
गांगुलीने १९९९च्या विश्वचषकात २६ मे ला इंग्लंंडमधील टांटन येथे श्रीलंकेविरुद्ध (Sri Lanka vs India) १८३ धावांची तूफान खेळी केली होती. त्याने १५८ चेंडूत ७ षटकार आणि १७ चौकारांच्या मदतीने या धावा केल्या होत्या. त्याने राहुल द्रविडबरोबर (१५४) दुसऱ्या विकेटसाठी ३१८ धावांची विक्रमी भागीदारी केली होती.
यावेळी भारतीय संघाच्या ३७३/६ भल्यामोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २१६ धावांवर संपुष्टात आला होता. त्यावेळी भारतीय संघाने हा सामना १५७ धावांनी जिंकला होता.
याव्यतिरिक्त गांगुलीने कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक २३९ धावसंख्या केल्या आहेत. या धावा त्याने पाकिस्तानविरुद्ध केला होता.
एमएस धोनी-
धोनीने ३१ ऑक्टोबर २००५ला जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडला होता. यावेळी त्याने १४५ चेंडूत १० षटकार आणि १५ चौकारांच्या मदतीने नाबाद १८३ धावा केल्या होत्या. ज्या एका यष्टीरक्षक फलंदाजाने केलेल्या सर्वाधिक धावा होत्या.
धोनीने षटकार मारत हा सामना ४ विकेट्सने जिंकला होता. याव्यतिरिक्त धोनीने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक २२४ धावा केल्या होत्या.
विराट कोहली-
विराटने १८ मार्च २०१२मध्ये ढाका येथे आपला कट्टर प्रतिस्पर्धी संघ असलेल्या पाकिस्तानविरुद्ध (Pakistan vs India) शानदार फटकेबाजी केली होती. त्याने १४८ चेंडूत १ षटकार आणि २२ चौकारांच्या मदतीने १८३ धावांची उत्कृष्ट खेळी केली होती. विराटच्या या धावांच्या मदतीने भारतीय संघाने ३३० धावांचे भले मोठे आव्हान ४ विकेट्स गमावून पार केले होते.
हे विराटचे ११ वे वनडे शतक होते. तसेच यानंतर त्याने आणखी ३२ शतके झळकावली आहेत.
याव्यतिरिक्त त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात सर्वाधिक नाबाद २५४ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-१९९८च्या आयसीसी वनडे क्रमवारीतील टॉप १० खेळाडू पाहून व्हाल थक्क