टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये सुवर्ण इतिहास रचल्यानंतर भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा दीर्घ विश्रांतीनंतर मैदानात परतला आहे. नीरजने आपला सराव सुरू केला आहे. जेव्हापासून नीरज चोप्राने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले तेव्हापासून त्याच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि मोठ्या पडद्यावर त्याची भूमिका कोण उत्तम वठवू शकतो? असा प्रश्न त्याला विचारला जात आहे.
यावर ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा म्हणतो की, त्याचे जीवन पडद्यावर दिसण्यापूर्वी त्याला आणखी काही पदके जिंकायची आहेत, कारण त्यामुळे त्याचा चित्रपट हिट होईल याची खात्री होईल. हरियाणाच्या भालाफेकपटूने ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत देशाला पहिले ऑलिम्पिक सुवर्णपदक मिळवून दिल्यापासून, त्याच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि त्याला चित्रपट बनवण्याबद्दल विचारले जात आहे. पण नीरज चोप्रा सांगतो की त्याचे प्राधान्य अजूनही खेळाला आहे.
एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना नीरज चोप्रा म्हणाला की, ‘मला चित्रपटाची ऑफर आली आहे, पण मला वाटते की मी जे काही मिळवले आहे ती फक्त सुरुवात आहे. हे माझे पहिले ऑलिम्पिक होते. मी आणखी पदके जिंकू शकतो. मला माझा चित्रपट फ्लॉप होऊ द्यायचा नाही. जर मी आणखी पदके जिंकू शकलो तर मला वाटते की हा चित्रपट चांगला हिट होईल. सध्या माझे संपूर्ण लक्ष खेळावर आहे, मी बॉलिवूडचा विचार केलेला नाही.’
त्याचवेळी भारताचा माजी हॉकी कर्णधार आणि ऐतिहासिक ऑलिम्पिक कांस्यपदक विजेत्या संघाचा गोलकीपर पीआर श्रीजेश याने देखील खुलासा केला की, त्यालाही त्याच्या जीवनावर आधारित चित्रपटाची ऑफर देण्यात आली आहे. तो म्हणाला, ‘मलाही बायोपिकची ऑफर आली होती आणि त्याबाबत माझी चर्चा सुरू आहे.’
नीरज चोप्राने २०२० टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले. यासह, ऍथलेटिक्समध्ये पदक जिंकणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. वैयक्तिक सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा भारताचा दुसरा खेळाडू आहे. नीरजच्या आधी अभिनव बिंद्राने १३ वर्षांपूर्वी बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
पुन्हा तुटणार विलियम्सन आणि संघाचे स्वप्न? ‘अशी’ राहिलीय ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंडची आमने सामने कामगिरी
टी२० विश्वचषक फायनलसाठी पंचांची नावे निश्चित, भारतातूनही आहे एक नाव; पाहा संपूर्ण यादी
मॅथ्यू वेड म्हणतोय, ‘हसन अलीने जरी झेल घेतला असता, तरी आम्ही जिंकलोच असतो’