आशिया खंडातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा असलेला आशिया चषक २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिरातीमध्ये (युएई) येथे खेळला जाणार आहे. आशिया खंडातील प्रमुख संघ या स्पर्धेत सहभागी होतील. चार वर्षांनी होत असलेल्या या स्पर्धेसाठी सर्व संघांनी आपली कंबर कसली आहे. २०१६ नंतर प्रथमच टी२० प्रकारात आशिया चषक खेळला जाईल. आगामी टी२० विश्वचषकाच्या दृष्टीने या स्पर्धेला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, या मानाच्या स्पर्धेत आतापर्यंत सर्वाधिक यश मिळवणारे खेळाडू कोण आहेत? हे देखील आपल्याला जाणून घ्यायला हवं.
आशिया चषक आत्तापर्यंत १४ वेळा खेळला गेला आहे. यामध्ये भारताचे वर्चस्व दिसून येते. कारण, भारताने तब्बल सात वेळा आशिया चषकावर कब्जा केला आहे. त्यानंतर श्रीलंकेने पाच आणि पाकिस्तानने दोन वेळा आशा चषक जिंकला आहे. भारत गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होईल.
आशिया चषकातील सर्वात यशस्वी फलंदाजांची यादी काढायची झाल्यास श्रीलंकेचे सनथ जयसूर्या (१२२० धावा) व कुमार संगकारा (१०७५ धावा) अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर भारताचा सचिन तेंडुलकर (९७१ धावा), पाकिस्तानचा शोएब मलिक (९०७ धावा), भारताचे रोहित शर्मा (८८३ धावा) व विराट कोहली (७६६ धावा) यांचा क्रमांक लागतो.
गोलंदाजीबद्दल बोलायचे झाल्यास, पहिल्या तीनही क्रमांकावर श्रीलंकेचे खेळाडू दिसून येतात. मुथय्या मुरलीधरन (३० बळी), लसिथ मलिंगा (२९ बळी) व अजंता मेंडीस (२६ बळी) हे पहिल्या तीन क्रमांकावर कायम आहेत. यानंतर पाकिस्तान सईद अजमल (२५ बळी) व पुन्हा श्रीलंकेचा चमिंडा वास (२३ बळी) यांचा क्रमांक लागतो. सध्या खेळत असलेल्या खेळाडूंपैकी भारताचा रवींद्र जडेजा २९ बळींसह नवव्या क्रमांकावर आहे. त्याला या यादीमध्ये आणखी वर जाण्याची संधी यावेळी असेल.
महत्त्वाच्या बातम्या-
रोहित-द्रविड जोडगोळीमुळे फळफळलंय ‘या’ सिनीयर खेळाडूंचं नशीब, एकटा ३ वर्षांपासून होता बाहेर
घरच्या लग्नात फेटा घालून सहभागी झाला मास्टर ब्लास्टर, साराच्या लूकवरही नेटकरी फिदा
मुंबईची वन फॅमिली बनली ग्लोबल! दक्षिण आफ्रिका आणि युएईतील फ्रॅंचाईजींच्या नावाची झाली घोषणा