सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दरम्यान जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळला जात आहे. 2021-2023 या सायकलचे विजेतेपद कोण उंचावणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेय. असे असतानाच आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या 2023-2025 या सायकलच्या मालिकांची घोषणा केलेली आहे.
आयसीसीने चालू अंतिम सामन्याच्या दरम्यान या मालिकांची घोषणा केली. एकूण नऊ संघ या सायकलमध्ये सहभागी होतील. प्रत्येक संघाला सहा मालिका खेळण्याची संधी मिळणार आहे. त्यापैकी तीन मालिका घरच्या मैदानावर तर तीन मालिका विरोधी संघाच्या मैदानावर त्यांना खेळाव्या लागतील. तर स्पर्धेचा अंतिम सामना जून 2025 मध्ये लॉर्ड्स मैदानावर खेळला जाईल. संपूर्ण सायकलमध्ये पहिल्या दोन क्रमांकावर राहणाऱ्या संघांना अंतिम सामना खेळण्याची संधी मिळेल.
भारतीय संघाबाबत बोलायचे झाल्यास भारतीय संघाने पहिल्या दोन्ही सायकलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. नव्या सायकलची सुरुवात भारतीय संघ वेस्ट इंडिजविरुद्ध ऑगस्ट महिन्यात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने करेल. ही मालिका वेस्ट इंडीजमध्ये होणार आहे. याव्यतिरिक्त भारतीय संघ ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेत आपल्या मालिका खेळेल. भारतीय संघाच्या घरच्या मालिका इंग्लंड, बांगलादेश व श्रीलंकेविरुद्ध खेळल्या जाणार आहेत.
नव्या सायकलमध्ये भारतीय संघात काही अमुलाग्र बदल होण्याची शक्यता वर्तवली जातेय. यशस्वी जयस्वाल, सर्फराज खान या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केलेल्या खेळाडूंना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जातेय. तसेच, रिषभ पंत संपूर्ण तंदुरुस्त होईपर्यंत ईशान किशन आता कसोटी संघाचा नियमित भाग बनू शकतो.
(ICC Announced New World Test Championship Cycle 2023-2025 India Play Six Series)
महत्वाच्या बातम्या –
कसोटीत पाचव्या दिवसाचा बॉस आहे कोहली! ‘ही’ आकडेवारी उंचावतेय चाहत्यांच्या अपेक्षा
सचिननंतर विराटच! WTC फायनलचा मौका साधून ‘किंग कोहली’ने केला महापराक्रम