रविवारी आयर्लंड आणि स्काॅटलॅंड यांच्यात रोमहर्षक सामना अखेर टाय अवस्थेच संपलाय यानंतर सुपर ओव्हर होणे अपेक्षित असताना त्या सामन्यात सुपर ओव्हर झाली नाही. यामुळे आता आयसीसीने याप्रकरणी माफी मागितली आहे.
टी२०मध्ये जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हरचे प्रयोजन आहे. याच अगदी आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत क्रिकेटमधील कोणताही सामना जरी टाय झाला तरी नियमाने सुपर ओव्हर खेळावी लागते. यात जो संघ सुपर ओव्हर जिंकतो तो संघ सामना जिंकतो.
याबद्दल आयसीसीने २८ सप्टेंबर २०१७ रोजी नियम केला आहे. त्यात नियम क्रमांक १६.३ नुसार सामना जर टाय झाला तर त्यात किती विकेट्स गेल्या किंवा अन्य कोणतेही घटक विचारत न घेता सरळ सुपर ओव्हर खेळवावी.
आयर्लंड विरुद्ध स्काॅटलॅंड सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या स्काॅटलॅंडने २० षटकांत ४ बाद १८५ धावा केल्या. तर या धावांचा पाठलाग करताना आयर्लंडनेही २० षटकांत १८५ धावाच केल्या. त्यानंतर सामनाधिकारी डेविड ज्युक आणि मैदानावरील पंच अॅलेन हॅगो आणि वॅन लिमंट यांनी आता सुपर ओव्हर होणार नाही असे तेव्हा सांगितले.
आयसीसीच्या अधिकाऱ्याने या प्रकरणाबद्दल दिलगीरी व्यक्त करताना त्यावेळी सामनाधिकारी आणि पंच यांचा गोंधळ उडाला आणि ही वेळ आली असे म्हटले आहे. ही खूप मोठी चुक असुन त्यासाठी आयसीसी माफी मागत असल्याचे म्हटले आहे. आम्ही या संपुर्व प्रकरणाची चौकशी करु असेही हा अधिकारी पुढे म्हटला आहे.
महत्वाच्या बातम्या-
-आपण जर क्रिकेट फॅन असाल तर ही आहे आपल्यासाठी महत्त्वाची बातमी