दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या तीन सामन्यांची कसोटी मालिका (sa vs ind test series) भारताला २-१ अशा फरकाने गमवावी लागली. विराट कोहलीच्या नेतृत्वातील भारतीय संघ यावर्षी दक्षिण अफ्रिका दौऱ्यात कसोटी मालिका जिंकून इतिहास घडवेल, अशी सर्वांना आशा होती. परंतु चाहत्यांची ही इच्छा अपूर्णच राहिली. मालिकेत भारतीय संघातील खेळाडूंनी खूपच निराशाजन प्रदर्शन केले. भारतीय संघाला दक्षिण अफ्रिका दौरा पूर्ण झाल्यानंतर फेब्रुवारी माहिन्यात श्रीलंकेविरुद्ध मायदेशात (ind vs sl test series) कसोटी मालिका खेळायची आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पार पडलेल्या या मालिकेनंतर आगामी कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात काही बदल होणे अपेक्षित आहे. आपण या लेखात अशाच काही गोष्टींवर नजर टाकणार आहोत, ज्या भारताच्या आगामी कसोटी मालिकेत बदललेल्या दिसू शकतात.
श्रीलंकेविरुद्ध मायदेशातील कसोटी मालिकेत भारतीय संघात होणारे अपेक्षित बदल –
१. सलामीवीर रोहित शर्माचे पुनरागमन –
दक्षिण अफ्रिका दौऱ्यापूर्वी रोहित शर्माला भारताच्या एकदिवसीय संघाचे कर्णधारपद आणि कसोटी संघाचे उपकर्णधारपद सोपवले गेले होते. परंतु दक्षिण अफ्रिकेला रवाना होण्यापूर्वी त्याच्या दुखापत झाल्यामुळे तो या दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. असे असले तरी, श्रीलंकेविरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेसाठी तो नक्कीच उपलब्ध असेल. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत मयंक अगरवालने दक्षिण अफ्रिकेविरुद्ध मालिकेत भारताच्या डावाची सुरुवात केली. अशात रोहित शर्माने संघात पुनरागमन केल्यानंतर मयंक संघातून बाहेर जाणे निश्चित आहे.
२. रहाणे-पुजारा यांचा पत्ता कट –
भारतीय संघाचे मधल्या फळीतील मुख्य फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे मागच्या मोठ्या काळापासून अपेक्षित खेळी करू शकलेले नाहीत. दक्षिण अफ्रिका दौऱ्यात देखील त्यांनी निराशा केली. या दोघांवर संघाच्या मधल्या फळीला भक्कम करण्याची जबाबदारी होती. मात्र, त्यांना ही जबाबदारी पार पाडता आली नाही. कसोटी मालिकेती या दोघांनी प्रत्येकी सहा वेळा फलंदाजी केली आणि यामध्ये फक्त एक-एक अर्धशतक ठोकले. यादरम्यान त्यांची धावा करण्याची सरासरी २५ होती. त्यांचे सततचे खराब प्रदर्शन पाहून श्रीलंकेविरुद्धच्या मायदेशातील मालिकेत त्यांनी संधी मिळणार नाही, अशी पूर्ण शक्यता आहे.
३. श्रेयस-हनुमा यांना संधी मिळणार –
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेला पुढच्या मालिसाठी संघातून बाहेर केल, तर श्रेयस अय्यर आणि हनुमा विहारी संघात स्वतःचे स्थान पक्के करतील. श्रेयस अय्यरने मागच्या महिन्यात न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिकेत स्वतःचे कसोटी पदार्पण केले होते. तसेच मयंक अगरवालने दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात संयमी खेळी दाखवली होती. या दोघांचे मागच्या काळातील प्रदर्शन पाहता, आगामी मालिकेत संधी मिळण्यासाठी ते प्रबळ दावेदार आहेत.
४. रवींद्र जडेजा पुनरागमन करणार –
दक्षिण अफ्रिकेविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला अष्टपैलू रवींद्र जडेजाची कमगतरता नक्कीच जाणवली आहे. जडेजा दुखापतीमुळे दक्षिण अफ्रिका दौऱ्यात सहभागी होऊ शकला नाही. पण मायदेशातील मालिकेत तो नक्कीच पुनरागमन करेल. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी जर तो तंदुरुस्त झाला, तर भारतीय संघाला अधिक मजबूती मिळेल. संघात पुनरागमन केल्यानंतर तो आणि रविचंद्रन अश्विन ही फिरकी गोलंदाजांची जोडी भारतीय संघासाठी फायदेशीर ठरेल.
५. मोहम्मद सिराजदेखील करेल पुनरागमन –
वेगवान गोलंदाजी मोहम्मद सिराजने अलिकडच्या काळात अप्रतिम प्रदर्शन करून सर्वांचेच लक्ष वेधले आहे. याच करणास्तव त्याला अनुभवी इशांत शर्मा आणि उमेश यादव यांच्यापेक्षा आधी संघात संधी मिळते. दक्षिण अफ्रिकेविरुद्ध पहिल्या मालिकेत देखील त्याने चांगली गोलंदाजी केली होती. पण, दुखापतीमुळे तो संघातून बाहेर झाला. त्याच्या जागी उमेश यादवला संधी मिळाली होती, परंतु तो जास्त प्रभावित करू शकला नाही.
महत्वाच्या बातम्या –
भारताच्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पराभवानंतर आमने-सामने आले जाफर आणि वॉन, पेटले ट्वीटरवॉर
जोकोविचमागची साडेसाती संपेना! ऑस्ट्रेलियन सरकारने मेलबर्नमधून घेतलं ताब्यात
व्हिडिओ पाहा –