आयसीसी १९ वर्षांखाली विश्वचषक स्पर्धेच्या १४व्या पर्वाला शुक्रवारपासून सुरुवात होत आहे. १९८८ साली सर्वात पहिल्यांदा झालेल्या आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेचे विजेतेपद ऑस्ट्रेलियाने पटकवले होते. नंतर ही स्पर्धा १९९८ मध्ये खेळली होती आणि त्यानंतर दर दोन वर्षांनी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा चांगलाच दबदबा राहिला आहे. आत्तापर्यंत भारताने या स्पर्धेची सर्वाधिक ४ विजेतीपदं आपल्या नावावर केली आहेत.
भारतीय खेळाडूंची ऐतिहासिक कामगिरी
भारतीय संघाबरोबरच असेही काही भारतीय खेळाडू आहेत, ज्यांनी १९ वर्षांखालील विश्वचषकात ऐतिहातिक कामगिरी केली आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत सलग तीन वेळा अर्धशतके झळकवणारा भारताचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. २००६ च्या स्पर्धेत त्याने हा पराक्रम केला होता.
तसेच पृथ्वी शाॅ हा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकणारा सर्वात तरुण भारतीय कर्णधार आहे. त्याने २०१८ मध्ये संघाला विजेतेपद पटकावून दिले होते. ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये चेतेश्वर पुजाऱ्याचे देखील नाव आहे, ज्याला २००६ च्या १९ वर्षांखालील विश्वचषकाचा मालिकावीर म्हणून निवडले होते. शिखर धवन हा एकाच १९ वर्षांखालील विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारा फलंदाज असून त्याने २००४ च्या १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत ५०५ धावा केल्या होत्या.
अधिक वाचा – राहुल द्रविड ‘हा’ सल्ला नेहमीच द्यायचे, पृथ्वी शॉने दिला १९ वर्षांखालील संघातील जुन्या आठणींना उजाळा
भारतीय संघाचा दबदबा
आयसीसी १९ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेत १६ संघ खेळ असून सर्वाधिकवेळा भारतीय संघाने स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. भारताने २०००, २००८, २०१२ आणि २०१८ साली या स्पर्धेचे विजेतेपद आपल्या नावे केले आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया संघ असून या संघाने आत्तपर्यंत तीन वेळा १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला आहे.
तसेच पाकिस्तान संघाने सुद्धा दोन वेळा विजेतेपद पटकावले आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, बांग्लादेश आणि वेस्ट इंडीजने प्रत्येकी एकदा स्पर्धा जिंकली आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका संघांनी अंतीम फेरीत धडक मारली आहे.
व्हिडिओ पाहा – १००९ धावा करणारा प्रणव धनावडे आहे तरी कुठे?
यंदा यश धुलच्या नेतृत्त्वाखाली खेळणार भारतीय संघ
वेस्ट इंडिजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या १९ वर्षांखालील विश्वचषक २०२२ स्पर्धेत भारताचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. या स्पर्धेत युवा भारतीय संघ यश धुलच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे. १९ वर्षाखालील विश्वचषक स्पर्धेत भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ ७ वेळा भिडले असुन ३ वेळा भारताने तर ४ वेळा दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
केपटाऊन कसोटीतील डीआरएसच्या वादानंतर भारतीय खेळाडूंवर होणार कारवाई? वाचा सविस्तर
भारताचे ‘यंगिस्तान’ आजपासून सुरू करणार १९ वर्षांखालील विश्वचषकातील अभियान, जाणून घ्या वेळापत्रक
‘संघाची निवड माझे काम नाही’, कर्णधार कोहलीचे पुजारा-रहाणेच्या भविष्याच्या प्रश्नावर चोख प्रत्युत्तर