भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या टी२० सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव केला आणि आणखी एक मालिका आपल्या नावावर केली. या मालिकेत विजय मिळवल्यानंतर भारताने एक विशेष कामगिरी करून दाखवली आहे. भारतीय संघ गेल्या ६ टी२० मालिकेतील एकही मालिका पराभूत झालेला नाही. गेल्या ६ टी२० मालिकेत भारताने ५ मालिकेत विजय मिळवला आहे तर, दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अनिर्णित राहिली.
भारताने केलेल्या या विश्ष कामगिरीची सुरुवात गेल्या वर्षी न्यूझीलंडसोबत खेळलेल्या टी२० मालिकेपासून झाली होती. या मालिकेत भारताने न्यूझीलंड संघाला ३-० च्या फरकाने व्हाईट वॉश देत मालिकेत विजय मिळवला होता. त्यानंतर खेळलेल्या वेस्टइंडिज विरुद्धच्या मालिकेत देखील भारताने विंडीजला व्हाईट वॉश देत मालिका ३-० च्या फरकाने खिशात घातली होती.
गेल्या वर्षीच खेळलेल्या श्रीलंकेविरुद्धच्या टी२० मालिकेत देखील भारतीय संघाने विरोधी संघाला व्हाईट वॉश देत ३-०ने विजय मिळवला होता. त्यानंतर यंदाच्या वर्षी खेळलेल्या दक्षिण आफ्रिका विरु्दधच्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत भआरताला २-२ अशी बरोबरी करता आली. ५व्या सामन्यात पावसाने अडथळा आणल्याने मालिका अनिर्णीत राहिली. त्यानंतर भारताचा संघ हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात अनेक युवा खेळाडूंना घेऊन आयर्लंड दौऱअयावर गेला होता. त्यावेळी देखील खेळलेल्या २ टी२० सामन्यांच्या मालिकेत भारताने २-०ने विजय मिळवला.
दरम्यान, सध्या सुरू असलेल्या टी२० मालिकेत देखील पहिल्या दोन्ही सामन्यात भारताने विजय मिळवल्याने मालिका खिशात घातली आहे. या मालिकेतील तिसरा सामना रविवार दिनांक १० जुलै रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघ आणखी एका मालिकेत व्हाईट वॉश मिळवण्याच्या प्रयत्नात असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
आजवर कुणालाही न जमलेला विक्रम बुमराहच्या पदरी! वाचून गर्वाने फुगेल तुमचीही छाती
‘या’ कारणामुळे सुनील गावसकर घालत नसत हेल्मेट, स्वतःच केला होता खुलासा
दुसऱ्या टी२० सामन्यात सामनावीर ठरलेल्या भुवीने दिलीये थेट कपिल देवला टक्कर! जाणून घ्या विक्रम