भारतीय संघ उद्या(27 फेब्रुवारी) ऑस्ट्रेलिया विरुद्ध दुसरा आणि शेवटचा टी20 सामना बंगळूरु येथे खेळणार आहे. या सामन्यात भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला इतिहास घडवण्याची संधी आहे.
बुमराहने या सामन्यात जर दोन विकेट्स घेतल्या. तर तो भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरेल. तसेच भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनला मागे टाकेल.
बुमराहने आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 41 सामन्यात 51 विकेट्स घेतल्या आहेत. या 51 विकेट्ससह तो सध्या भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज आहे. या यादीत अव्वल क्रमांकावर 52 विकेट्ससह अश्विन आहे.
त्याचबरोबर बुमराहने 24 फेब्रुवारीला विशाखापट्टणम येथे झालेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या टी20 सामन्यात 3 विकेट्स घेत आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये 50 विकेट्सचा टप्पा पार केला होता. हा टप्पा पार करणारा तो भारताचा अश्विननंतरचा दुसराच गोलंदाज ठरला होता.
तसेच बुमराह टी20 मध्ये भारताकडून सर्वात जलद 50 विकेट्स घेणारा गोलंदाजही ठरला आहे. अश्विनने 42 सामन्यात 50 विकेट्सचा टप्पा गाठला होता. तर बुमराहने 41 व्या सामन्यात हा कारनामा केला आहे.
भारताकडून आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज-
52 – आर अश्विन (46 सामने)
51 – जसप्रीत बुमराह (41 सामने)
46 – युजवेंद्र चहल (30 सामने)
36 – भुवनेश्वर कुमार (37 सामने)
36 – हार्दिक पंड्या (38 सामने)
35 – कुलदीप यादव(18 सामने)
महत्त्वाच्या बातम्या-
–दोन बदलांसह अशी असु शकते दुसऱ्या टी२० सामन्यासाठी टीम इंडिया
–पहिल्या टी२० खेळला नाही तरीही या कारणामुळे धवन झाला ट्रोल…
–हवाई दलाने दाखवलेल्या शौर्याला या दिग्गज क्रिकेटपटूंकडून सलाम