भारत आणि इंग्लंड यांच्यात पार पडलेल्या ५ टी२० सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने ३-२ ने विजय मिळवला आहे. या मालिकेतील पाचव्या आणि निर्णायक सामन्यात भारतीय संघाने ३६ धावांनी विजय मिळवला. ही मालिका टी -२० विश्वचषक स्पर्धेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची होती. तसेच या मालिकेत भारतीय संघाने युवा खेळाडूंना खेळण्याची संधी दिली होती. या संधीचे सोने करत, युवा खेळाडूंनी भारतीय संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र यानंतर भारतीय संघावर आयसीसीतर्फे दंड आकारण्यात आला आहे.
या सामन्यात इंग्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या भारतीय संघाने २२५ धावांचे आव्हान दिले होते. या धावांचा पाठलाग करत असताना इंग्लंड संघाला १८८ धावाच करता आल्या. भारतीय संघाने हा सामना ३६ धावांनी जिंकला. परंतु दुसऱ्या डावात गोलंदाजी करत असताना षटकांची गती कमी राखल्याने (स्लो ओवर रेट) आयसीसीने भारतीय संघांवर सामना शुल्काच्या ४० टक्के दंड ठोठावला आहे.
आयसीसीने धारा २.२२ नुसार, पाचव्या टी-२० सामन्यात भारतीय संघावर स्लो ओवर रेटचे आरोप लावले आहेत. या सामन्यात भारतीय संघावर निर्धारित वेळेपेक्षा २ षटक कमी फेकण्याचे आरोप लावले गेले आहेत. या सामन्यातील मैदानी पंच अनिल चौधरी व नितिन मेनन आणि तिसरे पंच केएन अनंतापदमनाभन यांनी देखील भारतीय संघावर यासंबंधी आरोप केले होते. यामुळे भारताचा कर्णधार विराट कोहलीने हे आरोप स्वीकार करत दंड भरण्यास मंजुरी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भविष्यात विराट कोहलीबरोबर सलामीला फलंदाजी करण्याच्या प्रश्नावर रोहित शर्माने दिले ‘हे’ उत्तर
युवी..युवी!! स्टेडियममध्ये प्रोस्ताहन देणाऱ्या चिमुकलीचा व्हिडिओ शेअर करत युवराज म्हणाला….