भारतीय संघाचे माजी फलंदाज दिलीप वेंगसरकर यांनी विराट कोहली आणि अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाबाबत नुकेतच महत्वपूर्ण विधान केले. रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने सिडनीतील कसोटी सामना अनिर्णीत ठेवल्यानंतर त्यांनी हे विधान केले. वेंगसरकर यांच्या मते विराट कोहलीच्या नेतृत्वापेक्षा रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघातील खेळाडू अधिक मोकळेपणाने खेळतांना दिसून येत आहेत. टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
“रहाणेच्या नेतृत्वाखाली संघाचा खेळ बहरतो आहे”
वेंगसरकर यांनी यावेळी रहाणेची भरभरून स्तुती केली. ते म्हणाले, “रहाणेच्या नेतृत्वात संघाचा खेळ बहरतो आहे. पहिल्या सामन्यात ३६ धावांवर सर्वबाद झाल्यानंतर दुसऱ्या सामन्यात विजयासह पुनरागमन करणे सोप्पे नव्हते. पण संघाने ते करून दाखवले. रहाणेच्या नेतृत्वाला याचे बरेच श्रेय जाते.”
“विराटच्या तुलनेत रहाणे अधिक स्वातंत्र्य देतो”
भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली आणि प्रभारी कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या नेतृत्वाची तुलना करताना वेंगसरकर म्हणाले, “रहाणेच्या नेतृत्वात खेळाडू विराटच्या नेतृत्वापेक्षा अधिक मोकळेपणाने खेळताना दिसून आले. रहाणे संघातील खेळाडूंना विराटपेक्षा अधिक स्वातंत्र्य देतो. त्यामुळे केवळ रवींद्र जडेजा किंवा आर अश्विन यांच्यासारख्या वरिष्ठ खेळाडूंनीच नव्हे तर मोहम्मद सिराज, शुबमन गिल यांच्यासारख्या नवोदित खेळाडूंनी देखील दमदार कामगिरी केली.”
दरम्यान, सिडनी कसोटी अनिर्णीत राखल्यानंतर अनेक माजी खेळाडूंनी रहाणेच्या रणनीतीचे कौतुक केले आहे. विशेषतः चौथ्या डावात रिषभ पंतला पाचव्या क्रमांकावर पाठवण्याचा डाव यशस्वी झाल्याने अनेकांनी रहाणेची या चालीबद्दल पाठ थोपटली आहे.
महत्वाच्या बातम्या:
ब्रिस्बेन में आप ही खेलो शुक्ला जी! त्या ट्विटमुळे सोशल मिडीयावर राजीव शुक्ला होत आहेत ट्रोल
भारताचा गड, सर करायला अवघड! या तीन महान कर्णधारांना आजवर भारतात जिंकता आली नाही एकही कसोटी
सिडनी कसोटीतील कामगिरीचा जडेजाला फायदा, अष्टपैलूंच्या क्रमवारीत पोहोचला या स्थानी