मुंबई इंडियन्स आयपीएल 2025 मध्ये अनेक बदलांसह पाहायला मिळू शकते. ज्यामधील सर्वात मोठे बदल म्हणजे की कर्णधारबाबत होऊ शकते. हार्दिक पांड्याला येत्या आयपीएलमध्ये कर्णधार पदावरुन हटवू शकते. त्याच्या जागी सुर्यकुमार यादव नवा कर्णधार बनू शकतो. एका रिपोर्ट्सनुसार रोहित शर्मासह संघातील अनेक खेळाडू हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदावर खूश नाहीत. त्याच सोबत सचन तेंडूलकर देखील सुर्याकुमार यादव कर्णधार बनवण्याच्या भुमिकेत आहे. मात्र या संबधी आधिकृत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
स्पोर्ट्सयारीने दिलेल्या बातमीनुसार, रोहितच्या कॅम्पने मुंबई इंडियन्सच्या टीम मॅनेंजमेंटला अल्टिमेटम दिला आहे. रोहित आणि सचिनसह अनेक खेळाडूंना पांड्याने कर्णधारपदी राहावे असे वाटत नाही. मुंबईने हार्दिकला अजूनही कर्णधारपदावर ठेवलं तर रोहित आणि सूर्यासोबत वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहही संघ सोडू शकतो. याबाबत मुंबई कॅम्पमध्ये सध्या खळबळ उडाली आहे.
आयपीएल 2024 मध्ये मुंबईने हार्दिक पांड्याला संघात आणले. 2022 पासून पांड्या गुजरात टायटन्सकडून खेळायचा. पण आयपीएल 2024 पूर्वी मुंबईने त्याला ट्रेड केले. हार्दिक पांड्या येताच रोहितकडून कर्णधारपद हिसकावून घेतले. रिपोर्टनुसार, मुंबईने रोहितला याची माहिती दिली नाही. त्याला न सांगता हा निर्णय घेण्यात आला. त्याचा परिणाम मुंबईतील सामन्यांवरही दिसून आला. यामुळे रोहित आणि त्याचे चाहते चांगलेच नाराज झाले होते.
रोहित शर्मानंतर हार्दिक पांड्या टी20 फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार बनणार होता. पण हे होऊ शकले नाही. त्याच्या जागी सूर्याला कर्णधारपद देण्यात आले. रिपोर्टनुसार, जय शाह पांड्याच्या बाजूने होते. मात्र अजित आगरकर तसेच इतर अधिकारी आणि रोहित यासाठी तयार नव्हते. जय शहामुळेच पांड्या काही काळ उपकर्णधार राहिला. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
हेही वाचा-
शाकिब अल हसननं पुन्हा संयम गमावला, मैदानावरील या कृतीनं सगळेच हैराण
बाबर आझमला कसोटी संघातून डच्चू मिळणार? आकडेवारी फारच लाजिरवाणी
‘तू नेहमीच माझं काम सोपं…’, शिखर धवनच्या निवृत्तीवर हिटमॅनची अनोखी प्रतिक्रिया