भारतात सध्या विजय हजारे ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतातील युवा खेळाडू आपल्या गोलंदाजीने आणि फलंदाजीने जलवा दाखवताना दिसून येत आहेत. दरम्यान, रविवारचा (१२ डिसेंबर) दिवस या स्पर्धेत खास ठरला आहे. या रविवारी या स्पर्धेत असे काही घडले जे आजवर घडले नव्हते.
रविवारी (१२ डिसेंबर) विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत ४ सामने खेळले गेले. या चारही सामन्यांमध्ये मिळून २५०० धावा झाल्या. चंदीगढ़ विरुद्ध मध्यप्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात मध्यप्रदेश संघाने ३३१ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना चंदीगड संघाला २२६ धावा करण्यात यश आले होते, तर आंध्रप्रदेश आणि हिमाचल प्रदेश यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ६१४ धावा झाल्या होत्या.
मुंबईत झालेल्या सामन्यात आंध्रप्रदेश संघाने ३२२ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना हिमाचल प्रदेश संघाला २९२ धावा करण्यात यश आले होते.
गुजरात आणि विदर्भ या दोन्ही संघांमध्ये ग्रुप ए चा सामना खेळला गेला. ज्यामध्ये एकूण ६८० धावा कुटल्या गेल्या. गुजरात संघाकडून सौरव चौहानने १४१ आणि हेत पटेलने तुफानी १०९ धावांची खेळी केली. या खेळीच्या जोरावर गुजरात संघाला ३६३ धावा करण्यात यश आले होते. प्रत्युत्तरात विदर्भ संघाला अवघ्या ३१७ धावा करण्यात यश आले होते. हा सामना विदर्भ संघाने ४६ धावांनी गमावला.
तसेच बंगाल आणि मुंबई यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण ५४१ धावा कुटल्या गेल्या. बंगाल संघाने प्रथम फलंदाजी करताना ३१८ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई संघाला ८ गडी बाद २२३ धावा करण्यात यश आले होते. पावसाचे आगमन झाल्यामुळे या सामन्यात मुंबई संघाला ४१ सामन्यात २९१ धावांची आवश्यकता होती.
राजकोटमध्ये मध्य प्रदेश आणि चंदीगढ़ यांच्यात ग्रुप-डीचा सामना रंगला. ज्यामध्ये एकूण ६५७ धावा झाल्या. या सामन्यात मध्यप्रदेश संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी बाद ३३१ धावा केल्या होत्या. या डावात वेंकटेश अय्यरने १५१ धावांची खेळी केली. या धावांचा पाठलाग करताना चंदीगड संघाला ३२६ धावा करण्यात यश आले.
महत्वाच्या बातम्या :
आयपीएल २०२२ बाबत बीसीसीआय अध्यक्षांनी दिली महत्त्वाची अपडेट; वाचा सविस्तर
“विराटला सन्मानाचे बाजूला करायला हवे होते”
“नाहीतर ५-० ने ऍशेस गेली समजा”; दिग्गज कर्णधाराचा इंग्लडला निर्वाणीचा इशारा