क्रिकेट हा खेळ जेवढा बॅट आणि बॉलने खेळला जातो, त्यापेक्षा खेळाडूंच्या मनात अधिक खेळला जातो. बर्याच वेळा एखाद्या देशात किंवा मैदानावर खेळायची दडपण खेळाडूवर इतके येते की तो त्यातून बाहेर पडू शकत नाही. असेच काहीसे पाकिस्तानचा ऑफस्पिनर हसीब अहसान यांच्या बाबतीत घडले होते. त्यांनी कसोटी कारकिर्दीतील अर्ध्यापेक्षा अधिक विकेट्स भारताविरुद्ध घेतल्या. पण जेव्हा इंग्लंडमध्ये गोलंदाजी करायची वेळ आली तेव्हा भातीपोटी इंग्लंडमध्ये कधीही गोलंदाजी केली नाही.
त्यांचा जन्म याच दिवशी म्हणजेच १५ जुलै १९३९ रोजी पाकिस्तानच्या पेशावर येथे झाला होता. हसीब ४ वर्षे पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेट खेळले. त्यांनी आपल्या ऑफ स्पिनची जादू भारताविरुद्ध चांगलीच दाखवली. त्यांनी भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांत १५ गडी बाद केले. पण त्याच्या गोलंदाजीची शैली नेहमीच वादात अडकली आणि याच भीतीमुळे ते इंग्लंडमध्ये गोलंदाजी करु शकले नाहीत.
त्यांची ही भीती भारताविरुद्धच्या १९६०-६१ साली झालेल्या कसोटी मालिकेत देखील खरी ठरली. याच मालिकेतील मुंबई येथे झालेल्या पहिल्याच कसोटी सामन्यात त्यांच्या गोलंदाजी शैलीमुळे त्यांचा चेंडू नो-बॉल ठरवण्यात आला होता. या सामन्यात हसीब यांनी 31 षटके टाकली. पण त्यांना कोणतीही विकेट मिळाली नाही.
भारत विरुद्ध कसोटीमध्ये हसीब यांनी केली सर्वोत्कृष्ट कामगिरी
हसीबच्या गोलंदाजीच्या शैलीवर प्रश्न उपस्थित होऊनही भारताविरुद्धच्या त्या मालिकेच्या चौथ्या कसोटी सामन्यात त्यांनी कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट कामगिरी केली होती. ही कसोटी चेन्नई येथे झाली. सामना अनिर्णित राहिला होता. त्या सामन्यात पहिल्या डावात पाकिस्तानने ४४८ धावा केल्या होत्या, तर भारताने ५३९ धावा केल्या होत्या. चंदू बोर्डे आणि पॉली उम्रीगर यांनी शतके ठोकली होती. पण पाकिस्तानकडून हसीब यांनी ६ बळी घेतले होते. पहिल्या डावात त्यांनी टाकलेल्या ८४ षटकांपैकी १९ निर्धाव षटके टाकली होती आणि २०२ धावा दिल्या.
वयाच्या 23 व्या वर्षी घेतली निवृत्ती
गोलंदाजीच्या शैलीमुळे हसीब यांची कारकीर्द फार काळ टिकली नाही. २३ व्या वर्षी त्यांना क्रिकेटचा निरोप घ्यावा लागला. त्यांनी १२ कसोटी सामन्यात २७ बळी घेतले होते. त्यांनी दोन डावांमध्ये पाच किंवा त्यापेक्षा जास्त बळी घेण्याचा पराक्रम केला होता. भारताविरुद्ध दोन्ही वेळा त्यांनी अशी कामगिरी केली होती. त्यांनी कारकिर्दीत ४९ प्रथम श्रेणी सामन्यांत १४२ बळी घेतल्या. १९८७ सालामध्ये क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर पाकिस्तान संघाचा व्यवस्थापक म्हणून ते पुन्हा इंग्लंडला गेले होते. तसेच त्यांनी पाकिस्तानचे निवडकर्ते म्हणूनही काम पाहिले.
महत्त्वाच्या बातम्या –
बिडीच्या पॅकेटवर झळकला मेस्सी, तर नेटकऱ्यांकडून आल्या ‘अशा’ प्रतिक्रिया
मोठी बातमी! रिषभ पंत पाठोपाठ भारतीय संघातील ‘हा’ सदस्य देखील कोरोना पॉझिटिव्ह