मुंबई। डॉ. डी वाय पाटील स्टेडियम स्पोर्ट्स अकादमी येथे शनिवारी (२३ एप्रिल) इंडियन प्रीमीयर लीग २०२२ हंगामातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स संघात सामना पार पडला. या सामन्यात कोलकाताला केवळ ८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. अखेरच्या षटकापर्यंत लढत देऊनही कोलकाताला पराभवाचा सामना करावा लागल्याने कर्णधार श्रेयस अय्यर याने निराशा व्यक्त केली. याबरोबर त्याने या पराभवाचे कारणही सांगितले आहे.
कोलकातासाठी हा आयपीएल २०२२ मधील (IPL 2022) सलग चौथा पराभव ठरला आहे. या सामन्यात कोलकाताची फलंदाजांची वरची फळी मोठे योगदान देण्यात अपयशी ठरली.
याबद्दल बोलताना श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) म्हणाला, ‘पॉवरप्लेमध्ये आम्ही धावांचा पाठलाग करताना ज्याप्रकारे फलंदाजी केली आणि पहिल्या ६ षटकांत ज्याप्रकारची आमची गोलंदाजी झाली ती चांगली नव्हती. मला वाटते इथे १६० ते १६५ धावा चांगल्या होत्या आणि आम्ही त्याखालीच गुजरातला रोखण्यात यश मिळवले. या क्रिकेटप्रकारात सर्व सामने अटीतटीची होतात, त्यामुळे तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागतात. आमचे गेल्या ४ पैकी ३ सामने खूप अटीतटीचे झाले. सामन्यापूर्वी खेळाडूंमध्ये उत्साह चांगला होता, मात्र, मी निराश आहे की आम्ही सामन्यात चांगली कामगिरी करू शकलो नाही.’
या सामन्यात (KKR vs GT) गुजरातने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ९ बाद १५६ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडून कर्णधार हार्दिक पंड्याने ६७ धावांची अर्धशतकी खेळी केली. तसेच कोलकाताकडून आंद्र रसेलने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या.
कोलकाताकडून १५७ धावांचा पाठलाग करताना आंद्र रसेलने सर्वाधिक ४८ धावा केल्या. तो आक्रमक खेळ करत असतानाच अखेरच्या षटकात बाद झाला. तो बाद झाल्याने कोलकाताच्या विजयाच्या आशेलाही सुरुंग लागला. अखेर कोलकाता ८ धावांनी पराभूत झाले. रसेल व्यतिरिक्त रिंकू सिंगने ३५ धावांची चांगली खेळी केली होती. गुजरातकडून मोहम्मद शमी, यश दयाल आणि राशिद खान यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या –
क्रिकेटविश्वातून दु:खद बातमी! मुंबईच्या माजी खेळाडूने वयाच्या ४०व्या वर्षीच घेतला अखेरचा श्वास